शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:17 IST

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान 

आष्टी : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने वस्तीवरील रस्ते वाहून गेली आहेत. तेथील नागरीकांचा संपर्क तुटला आहे. तर उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. 

सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागिल तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या सामना करावा लागलेल्या शेतक-यांना यावर्षी तरी चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. शेतक-यांनी खरीपातील पेरणी उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, काढणीला आलेले उडीद पिक शेतक-याला पावसाने काढता आले नाही. तर काढणी करुन ठेवलेले उडीद रात्री अचानक जोरदार पाऊस आल्याने भिजले. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली. पावसाअभावी उत्पन्न घटले आता थोडेफार आलेले उत्पन्न ऐन तोंडात भरवायला आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

आष्टी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये पावसाने शेतकर्‍यांचे मका,ऊस,उडिद, बाजरी, कापूस,तुर अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे.पिके पाण्यात आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी केलेली बाजरी पाण्यात भिजत आहे.तर काही शेतकऱ्यांच्या उडिद,बाजरी पिकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.काही शेतक-यांचा उडिद बाजारात गेला असून काही शेतकऱ्यांचा पाण्यात भिजत आहे.तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके पाण्यात भिजत आहेत.या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आर्थिक मदत करावी आमच्या सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात असा आता पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस,सायबिन,कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी - सोमनाथ क्षीरसागर शेतकरी सावरगाव

पिकांचे डोळ्यांदेखत नुकसानपावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपुर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संतधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पिक कोमेजले. रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- भगवानराव सांगळे ( शेतकरी,क-हेवडगांव ) 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडagricultureशेती