शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:17 IST

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान 

आष्टी : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने वस्तीवरील रस्ते वाहून गेली आहेत. तेथील नागरीकांचा संपर्क तुटला आहे. तर उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. 

सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागिल तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या सामना करावा लागलेल्या शेतक-यांना यावर्षी तरी चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. शेतक-यांनी खरीपातील पेरणी उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, काढणीला आलेले उडीद पिक शेतक-याला पावसाने काढता आले नाही. तर काढणी करुन ठेवलेले उडीद रात्री अचानक जोरदार पाऊस आल्याने भिजले. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली. पावसाअभावी उत्पन्न घटले आता थोडेफार आलेले उत्पन्न ऐन तोंडात भरवायला आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

आष्टी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये पावसाने शेतकर्‍यांचे मका,ऊस,उडिद, बाजरी, कापूस,तुर अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे.पिके पाण्यात आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी केलेली बाजरी पाण्यात भिजत आहे.तर काही शेतकऱ्यांच्या उडिद,बाजरी पिकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.काही शेतक-यांचा उडिद बाजारात गेला असून काही शेतकऱ्यांचा पाण्यात भिजत आहे.तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके पाण्यात भिजत आहेत.या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आर्थिक मदत करावी आमच्या सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात असा आता पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस,सायबिन,कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी - सोमनाथ क्षीरसागर शेतकरी सावरगाव

पिकांचे डोळ्यांदेखत नुकसानपावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपुर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संतधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पिक कोमेजले. रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- भगवानराव सांगळे ( शेतकरी,क-हेवडगांव ) 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडagricultureशेती