शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:17 IST

मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान 

आष्टी : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने वस्तीवरील रस्ते वाहून गेली आहेत. तेथील नागरीकांचा संपर्क तुटला आहे. तर उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. 

सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागिल तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या सामना करावा लागलेल्या शेतक-यांना यावर्षी तरी चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. शेतक-यांनी खरीपातील पेरणी उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, काढणीला आलेले उडीद पिक शेतक-याला पावसाने काढता आले नाही. तर काढणी करुन ठेवलेले उडीद रात्री अचानक जोरदार पाऊस आल्याने भिजले. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली. पावसाअभावी उत्पन्न घटले आता थोडेफार आलेले उत्पन्न ऐन तोंडात भरवायला आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

आष्टी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये पावसाने शेतकर्‍यांचे मका,ऊस,उडिद, बाजरी, कापूस,तुर अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे.पिके पाण्यात आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी केलेली बाजरी पाण्यात भिजत आहे.तर काही शेतकऱ्यांच्या उडिद,बाजरी पिकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.काही शेतक-यांचा उडिद बाजारात गेला असून काही शेतकऱ्यांचा पाण्यात भिजत आहे.तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके पाण्यात भिजत आहेत.या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आर्थिक मदत करावी आमच्या सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात असा आता पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस,सायबिन,कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी - सोमनाथ क्षीरसागर शेतकरी सावरगाव

पिकांचे डोळ्यांदेखत नुकसानपावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपुर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संतधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पिक कोमेजले. रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- भगवानराव सांगळे ( शेतकरी,क-हेवडगांव ) 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडagricultureशेती