शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सत्ता बदलाचे चटके जिल्ह्याला, मात्र धारूरला दिसत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

धारूर : सत्ता बदलामुळे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना चटके बसले आहेत. मात्र, धारूरला याचे चटके बसल्याचे दिसत ...

धारूर : सत्ता बदलामुळे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना चटके बसले आहेत. मात्र, धारूरला याचे चटके बसल्याचे दिसत नसून विकासकामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत, आपल्या कार्यकाळात विकासकामांचे सातत्य ठेवत असल्याने डॉ. हजारींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खा. प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे.

स्वच्छता हीच सेवा अंतर्गत ‘झाडे लावा झाडे जगवा’, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन खा. मुंडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत हाेत्या. नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, मुख्याधिकारी नितीन बागूल, उपाध्यक्षा मीनाक्षी गायकवाड, भाजपा नेते उदयसिंह दिख्खत, नगरसेविका रंजना चव्हाण, ज्योती सिरसट आदींची यावेळी उपस्थिती होती.

या प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी म्हणाले, शहरामध्ये तीन हजार वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचे काम सुरू आहे. गुत्तेदारावर संगोपनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कासार तलाव सुशोभीकरण, अद्ययावत कॉप्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. नगर परिषदेची इमारत अद्ययावत झाली असून, १० कोटी रुपयांच्या निधीतून कामे सुरू आहेत. सत्ता बदलानंतर निधी अडविल्यामुळे काही कामे करण्यासाठी अडचणी आल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेवक, पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

===Photopath===

270621\1818-img-20210627-wa0086.jpg

===Caption===

धारूर नगरपरीषद मध्ये वृक्षारोपन करताना खा.प्रितम मुंडे नगराध्यक्ष डाॕ. स्वरूपसिंह हजारी भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी उदयसिंह दिख्खत मुख्याधीकारी नितिन बागूल