शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

महास्वच्छतेसाठी एकवटले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:17 IST

नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे ऐतिहासिक कार्य : पालिका, व्यापारी महासंघ, संस्थांचा सहकार्यासाठी पुढाकार

बीड : नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातून प्रतिष्ठानचे जवळपास २५ हजार श्री सदस्य या स्वच्छता महायज्ञात सहभागी होतील, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रतिष्ठानचे सिद्धेश्वर आडसुळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इंजि विष्णू देवकते, सुभाष सपकाळ उपस्थित होते.प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले असून अनेक वर्षांपासून त्यांचे हे काम नियमित चालू आहे. कार्याची प्रसिद्धी न करता सेवा आणि कर्तव्य म्हणून हे प्रतिष्ठान काम करीत आहे. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानात बीड न.प.ने देशात झालेल्या स्वच्छता पाहणीत ५१२ वा क्रमांक मिळविला होता. धडक स्वच्छता मोहीम यासह विविध स्वच्छता उपक्र माच्या माध्यमातून न.प.ने देशात १०२ वा क्र मांक पटकावून स्वच्छता अभियानामध्ये आपली ओळख निर्माण केली.बीड शहराचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पालिकेची यंत्रणा कमी पडत आहे, तसेच स्वछतेच्या बाबतीत जनजागृतीची गरज आहे. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बीड शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार आहे. जवळपास २० ते २५ हजार स्वयंसेवक सेवा भावातून संपूर्ण राज्यातून बीड शहरात येणार असून अवघ्या चार तासांमध्ये बीड शहर स्वच्छ करणार आहेत.न.प.प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था यांचा या अभियानात सहकार्याच्या भूमिकेत सहभाग राहणार आहे. नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे सर्व साधक कसल्याही लाभाची अपेक्षा ठेवून काम करीत नाहीत तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.या प्रतिष्ठाणने महास्वच्छता अभियानासाठी बीड शहराची निवड केली त्याबद्दल मी नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे आभार मानतो, असे डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.अभियानासाठी यंत्रणा सज्जया अभियानासाठी स्वंयसेवकाना मदत करण्यासाठी शहरातील व्यापारी अन नागरिक सहभागी होणार आहेत. जवळपास ४७ मार्ग, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळ, शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये अभियान राबवले जाणार आहे. ७०० ट्रॅक्टर, २५ जेसीबीद्वारे एक हजार टन कचरा गोळा केला जाणार आहे.केवळ राष्टÑासाठी कार्य - आडसूळराष्टÑाने आपल्यासाठी खूप काही केले आहे. आपणही राष्टÑासाठी, भारतमातेसाठी काही तरी निष्काम भावनेने केले पाहिजे, या उदात्तहेतूने नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान कार्य करीत आहे. यासारख्या स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात, असे प्रतिष्ठानचे बीड जिल्ह्याचे सिद्धेश्वर आडसूळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान