शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महास्वच्छतेसाठी एकवटले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:17 IST

नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे ऐतिहासिक कार्य : पालिका, व्यापारी महासंघ, संस्थांचा सहकार्यासाठी पुढाकार

बीड : नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातून प्रतिष्ठानचे जवळपास २५ हजार श्री सदस्य या स्वच्छता महायज्ञात सहभागी होतील, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रतिष्ठानचे सिद्धेश्वर आडसुळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इंजि विष्णू देवकते, सुभाष सपकाळ उपस्थित होते.प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले असून अनेक वर्षांपासून त्यांचे हे काम नियमित चालू आहे. कार्याची प्रसिद्धी न करता सेवा आणि कर्तव्य म्हणून हे प्रतिष्ठान काम करीत आहे. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानात बीड न.प.ने देशात झालेल्या स्वच्छता पाहणीत ५१२ वा क्रमांक मिळविला होता. धडक स्वच्छता मोहीम यासह विविध स्वच्छता उपक्र माच्या माध्यमातून न.प.ने देशात १०२ वा क्र मांक पटकावून स्वच्छता अभियानामध्ये आपली ओळख निर्माण केली.बीड शहराचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पालिकेची यंत्रणा कमी पडत आहे, तसेच स्वछतेच्या बाबतीत जनजागृतीची गरज आहे. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बीड शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार आहे. जवळपास २० ते २५ हजार स्वयंसेवक सेवा भावातून संपूर्ण राज्यातून बीड शहरात येणार असून अवघ्या चार तासांमध्ये बीड शहर स्वच्छ करणार आहेत.न.प.प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था यांचा या अभियानात सहकार्याच्या भूमिकेत सहभाग राहणार आहे. नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे सर्व साधक कसल्याही लाभाची अपेक्षा ठेवून काम करीत नाहीत तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.या प्रतिष्ठाणने महास्वच्छता अभियानासाठी बीड शहराची निवड केली त्याबद्दल मी नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे आभार मानतो, असे डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.अभियानासाठी यंत्रणा सज्जया अभियानासाठी स्वंयसेवकाना मदत करण्यासाठी शहरातील व्यापारी अन नागरिक सहभागी होणार आहेत. जवळपास ४७ मार्ग, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळ, शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये अभियान राबवले जाणार आहे. ७०० ट्रॅक्टर, २५ जेसीबीद्वारे एक हजार टन कचरा गोळा केला जाणार आहे.केवळ राष्टÑासाठी कार्य - आडसूळराष्टÑाने आपल्यासाठी खूप काही केले आहे. आपणही राष्टÑासाठी, भारतमातेसाठी काही तरी निष्काम भावनेने केले पाहिजे, या उदात्तहेतूने नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान कार्य करीत आहे. यासारख्या स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात, असे प्रतिष्ठानचे बीड जिल्ह्याचे सिद्धेश्वर आडसूळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान