शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

महास्वच्छतेसाठी एकवटले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:17 IST

नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे ऐतिहासिक कार्य : पालिका, व्यापारी महासंघ, संस्थांचा सहकार्यासाठी पुढाकार

बीड : नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातून प्रतिष्ठानचे जवळपास २५ हजार श्री सदस्य या स्वच्छता महायज्ञात सहभागी होतील, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रतिष्ठानचे सिद्धेश्वर आडसुळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इंजि विष्णू देवकते, सुभाष सपकाळ उपस्थित होते.प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले असून अनेक वर्षांपासून त्यांचे हे काम नियमित चालू आहे. कार्याची प्रसिद्धी न करता सेवा आणि कर्तव्य म्हणून हे प्रतिष्ठान काम करीत आहे. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानात बीड न.प.ने देशात झालेल्या स्वच्छता पाहणीत ५१२ वा क्रमांक मिळविला होता. धडक स्वच्छता मोहीम यासह विविध स्वच्छता उपक्र माच्या माध्यमातून न.प.ने देशात १०२ वा क्र मांक पटकावून स्वच्छता अभियानामध्ये आपली ओळख निर्माण केली.बीड शहराचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पालिकेची यंत्रणा कमी पडत आहे, तसेच स्वछतेच्या बाबतीत जनजागृतीची गरज आहे. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बीड शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार आहे. जवळपास २० ते २५ हजार स्वयंसेवक सेवा भावातून संपूर्ण राज्यातून बीड शहरात येणार असून अवघ्या चार तासांमध्ये बीड शहर स्वच्छ करणार आहेत.न.प.प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था यांचा या अभियानात सहकार्याच्या भूमिकेत सहभाग राहणार आहे. नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे सर्व साधक कसल्याही लाभाची अपेक्षा ठेवून काम करीत नाहीत तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.या प्रतिष्ठाणने महास्वच्छता अभियानासाठी बीड शहराची निवड केली त्याबद्दल मी नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे आभार मानतो, असे डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.अभियानासाठी यंत्रणा सज्जया अभियानासाठी स्वंयसेवकाना मदत करण्यासाठी शहरातील व्यापारी अन नागरिक सहभागी होणार आहेत. जवळपास ४७ मार्ग, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळ, शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये अभियान राबवले जाणार आहे. ७०० ट्रॅक्टर, २५ जेसीबीद्वारे एक हजार टन कचरा गोळा केला जाणार आहे.केवळ राष्टÑासाठी कार्य - आडसूळराष्टÑाने आपल्यासाठी खूप काही केले आहे. आपणही राष्टÑासाठी, भारतमातेसाठी काही तरी निष्काम भावनेने केले पाहिजे, या उदात्तहेतूने नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान कार्य करीत आहे. यासारख्या स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात, असे प्रतिष्ठानचे बीड जिल्ह्याचे सिद्धेश्वर आडसूळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान