शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परळी शहरातून राख वाहतूक कायम बंद करण्याची नागरिकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:23 IST

शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी (बीड ):  शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर, टोकवाडी राख तळ्यातून दररोज दोनशे वाहनाद्वारे राख उचलून शहराच्या विविध मार्गाने वाहतूक चालू होती. ही वाहतूक रविवारपासून बंद करण्यात आली. कन्हेरवाडीच्या ग्रामस्थांनी ही वाहतूक रोखून शहरातील राखेच्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणार्‍या समस्येला वाचा फोडली आणि महसूल, पोलीस व विद्युत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखेची वाहतूकच बंद केली.

पोलीस ठाणे, न.प.कार्यालय, वैद्यनाथ मंदिर परिसरातून बिनधास्तपणे राखेची उघडी वाहतूक होत होती. सोमवारी प्रशासनाच्या या  निर्णयानंतर  वाहतूकही सुरळीत झाली. राखेची उघडी वाहतूक  कायम स्वरुपी  वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे म्हणाले, राखेच्या प्रदूषणामुळे जीव घेणे अपघात होत आहेत. राखेची उघड्या ट्रकद्वारे वाहतूक केली जात असल्याने राखेचे थर दुकानात व घरात जाऊन साचत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डोळ्याचे, श्वसनाचे, त्वचेचे गंभीर विकार होत आहेत. या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. राखेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडत आहेत, आता  लगाम लागेल. राखेची वाहतूक बंदी हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे राकाँचे डॉ.संतोष मुंडे म्हणाले. 

राखेच्या उघड्या  वाहतुकीला तूर्त लगामशासनाने कायमस्वरु पी राखेची वाहतूक बंद केली पाहिजे. दाऊतपूर, गंगाखेड रोड, ईटके चौक, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन रोड, आझाद चौक, कन्हेरवाडी रोड, धर्मापुरी रोड, टोकवाडी रोड, परळी शहर, चादांपूर रोड, मलकापुर रोड, नंदागौळ रोड या मार्गाने दररोज २०० वाहनांतून राखेची वाहतूक केली जाते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या वाहतुकीमुळे विविध आजारांमध्ये होत असल्याची तक्र ार कैलास तांदळे यांनी केली आहे. राख वापरणे पर्यावरणाचा सदुपयोग आहे. राखेची बंद वाहन किंवा आच्छादन अंथरून वाहतूक करावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीड