शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
3
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
4
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
5
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
6
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
7
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
8
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
9
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
10
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
13
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
14
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
15
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
16
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
17
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
18
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
19
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
20
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात

परळी शहरातून राख वाहतूक कायम बंद करण्याची नागरिकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:23 IST

शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी (बीड ):  शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर, टोकवाडी राख तळ्यातून दररोज दोनशे वाहनाद्वारे राख उचलून शहराच्या विविध मार्गाने वाहतूक चालू होती. ही वाहतूक रविवारपासून बंद करण्यात आली. कन्हेरवाडीच्या ग्रामस्थांनी ही वाहतूक रोखून शहरातील राखेच्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणार्‍या समस्येला वाचा फोडली आणि महसूल, पोलीस व विद्युत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखेची वाहतूकच बंद केली.

पोलीस ठाणे, न.प.कार्यालय, वैद्यनाथ मंदिर परिसरातून बिनधास्तपणे राखेची उघडी वाहतूक होत होती. सोमवारी प्रशासनाच्या या  निर्णयानंतर  वाहतूकही सुरळीत झाली. राखेची उघडी वाहतूक  कायम स्वरुपी  वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे म्हणाले, राखेच्या प्रदूषणामुळे जीव घेणे अपघात होत आहेत. राखेची उघड्या ट्रकद्वारे वाहतूक केली जात असल्याने राखेचे थर दुकानात व घरात जाऊन साचत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डोळ्याचे, श्वसनाचे, त्वचेचे गंभीर विकार होत आहेत. या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. राखेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडत आहेत, आता  लगाम लागेल. राखेची वाहतूक बंदी हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे राकाँचे डॉ.संतोष मुंडे म्हणाले. 

राखेच्या उघड्या  वाहतुकीला तूर्त लगामशासनाने कायमस्वरु पी राखेची वाहतूक बंद केली पाहिजे. दाऊतपूर, गंगाखेड रोड, ईटके चौक, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन रोड, आझाद चौक, कन्हेरवाडी रोड, धर्मापुरी रोड, टोकवाडी रोड, परळी शहर, चादांपूर रोड, मलकापुर रोड, नंदागौळ रोड या मार्गाने दररोज २०० वाहनांतून राखेची वाहतूक केली जाते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या वाहतुकीमुळे विविध आजारांमध्ये होत असल्याची तक्र ार कैलास तांदळे यांनी केली आहे. राख वापरणे पर्यावरणाचा सदुपयोग आहे. राखेची बंद वाहन किंवा आच्छादन अंथरून वाहतूक करावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीड