शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परळी शहरातून राख वाहतूक कायम बंद करण्याची नागरिकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:23 IST

शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी (बीड ):  शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे. 

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर, टोकवाडी राख तळ्यातून दररोज दोनशे वाहनाद्वारे राख उचलून शहराच्या विविध मार्गाने वाहतूक चालू होती. ही वाहतूक रविवारपासून बंद करण्यात आली. कन्हेरवाडीच्या ग्रामस्थांनी ही वाहतूक रोखून शहरातील राखेच्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणार्‍या समस्येला वाचा फोडली आणि महसूल, पोलीस व विद्युत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखेची वाहतूकच बंद केली.

पोलीस ठाणे, न.प.कार्यालय, वैद्यनाथ मंदिर परिसरातून बिनधास्तपणे राखेची उघडी वाहतूक होत होती. सोमवारी प्रशासनाच्या या  निर्णयानंतर  वाहतूकही सुरळीत झाली. राखेची उघडी वाहतूक  कायम स्वरुपी  वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे म्हणाले, राखेच्या प्रदूषणामुळे जीव घेणे अपघात होत आहेत. राखेची उघड्या ट्रकद्वारे वाहतूक केली जात असल्याने राखेचे थर दुकानात व घरात जाऊन साचत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डोळ्याचे, श्वसनाचे, त्वचेचे गंभीर विकार होत आहेत. या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. राखेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडत आहेत, आता  लगाम लागेल. राखेची वाहतूक बंदी हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे राकाँचे डॉ.संतोष मुंडे म्हणाले. 

राखेच्या उघड्या  वाहतुकीला तूर्त लगामशासनाने कायमस्वरु पी राखेची वाहतूक बंद केली पाहिजे. दाऊतपूर, गंगाखेड रोड, ईटके चौक, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन रोड, आझाद चौक, कन्हेरवाडी रोड, धर्मापुरी रोड, टोकवाडी रोड, परळी शहर, चादांपूर रोड, मलकापुर रोड, नंदागौळ रोड या मार्गाने दररोज २०० वाहनांतून राखेची वाहतूक केली जाते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या वाहतुकीमुळे विविध आजारांमध्ये होत असल्याची तक्र ार कैलास तांदळे यांनी केली आहे. राख वापरणे पर्यावरणाचा सदुपयोग आहे. राखेची बंद वाहन किंवा आच्छादन अंथरून वाहतूक करावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीड