शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अनलॉक होताच नागरिक सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शि‌थिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. ...

बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शि‌थिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तर किराणा आणि भाजी बाजारात वर्दळ कमी दिसून आली. शहरातील मोंढा, सुभाष रोडवर दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांना आला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यातच सुरूवातीला किराणा, भाजी, बेकरी, आदी जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेला काही तासांसाठी मुभा दिली होती. मात्र अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यानंतर निर्बंध आणखी कडक करीत किराणा, भाजी, बेकरी या अत्यावश्यक सेवादेखील सलग पंधरा दिवस बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने शासनाने ठरविलेल्या तिसऱ्या स्तरात बीड जिल्ह्याचा समावेश झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून शहरातील अत्यावश्यक सेवांसह अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने उघडली. कापड, मोबाईल, सराफा, भांडी आदी सर्वच दुकाने दोन महिन्यानंतर उघडली. तर दोन महिन्यांपासून तुंबलेली खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले. त्यामुळे शहरातील सर्वच भागात वर्दळ दिसून आली. अनलॉकचा पहिला दिवस असल्याने ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती.

सुभाष रोडवर आदर्श मार्केट, सिद्धी विनायक संकुल, सुभाष रोड, माळीवेस , कारंजा, बशीरगंज, मोंढा भागातील विविध दुकानांवर ग्राहक दिसून आले.

---------

कोरोनाचे भान विसरले

अनलॉकनंतर पहिल्या दिवशी बाजारात उसळलेली गर्दी पाहता लोक कोरोनाचे भान विसरल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये सॅनिटायझर शोभेलाच होते. अनेक जण मास्क वापरताना दिसून आले. तर काही जण उघड्या तोंडाने फिरताना दिसून आले. भेळ, चहाच्या गाड्यांभोवती लोकांचा गराडा दिसून आल्याने कोरोनाचे भान विसरले की काय? असे वाटत होते.

------------

सोशल डिस्टन्स वाऱ्यावर

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने साथरोग कायद्यानुसार नियम सुरुवातीपासून लागू केलेले आहेत. मात्र सोमवारी अनलॉक म्हणजे रान मोकळे अशा अविर्भावात दुकानांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा कठोर पाऊल उचलावे लागणार आहे.

---------

वाहतुकीची कोंडी

अनलॉकमुळे नागरिक खरेदीसाठी लेकराबाळांसह घराबाहेर पडले होते. तर माल वाहतुकीच्या वाहनांची ये- जा सुरू होती. दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरात जागोजागी कोंडी झाली होती.