शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर त्यास समितीच जबाबदार राहील,’ अशी शपथ घेत अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर ६०१ मुलींनी आत्मभानाचा निर्धार करीत शिवाय लहान वयात बोहल्यावर चढण्याआधी सामाजिक परिवर्तनाला बळ दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी अंबाजोगाईच्या मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराने ३० गावांमधून सुरू असलेली ही चळवळ व्यापक करण्यासाठी ‘मनस्विनी’च्या प्रमुख प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात २०, तर धारूर तालुक्यात १० अशा ३० गावांमध्ये निर्धार समानता प्रकल्प राबविला जात आहे. बालविवाह प्रतिबंध, हुंडा या प्रथेविरुद्ध जनजागृती, लिंगभाव समानता हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ घेत ३० गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या समितीची माहिती संपूर्ण गावकऱ्यांना व्हावी, यासाठी मनस्विनी महिला प्रकल्पाच्यावतीने गावात फलक लावलेला आहे. समितीतील सदस्यांचे क्रमांक तसेच चाईल्ड लाईन्सचा टोलफ्री क्रमांक या फलकावर लावला आहे. यामुळे जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन होते. या कालावधीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुपचुप गेटकेन विवाह होऊ लागले. यात प्रामुख्याने १२ ते १६ वर्षे वयाच्या मुलींचे विवाहदेखील जुळू लागले. अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून मनस्विनीच्या माध्यमातून गावातील समित्यांना प्रशिक्षण दिले. बालविवाह रोखण्यासाठी गावात काय उपाययोजना करता येऊ शकतात? याचे मार्गदर्शन केले तसेच बालविवाह थांबलेल्या मुलींच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कोरोना काळात मनस्विनीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी २१ बालविवाह रोखले, ही या चळवळीची जमेची बाजू म्हणावी लागेल.

१० गावांमध्ये आत्मभान केंद्रांची स्थापना

किशोरवयीन मुली व महिलांसाठी गावांमध्येच आत्मभान केंद्रांचीही सुरुवात झाली आहे. या केंद्रांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण गावातच उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील युवक-युवतींचे बालविवाह होऊ नयेत यासाठी ग्रामसमित्याही पुढाकार घेत आहेत, तर आत्मभान केंद्रात ५० विविध पुस्तके, खेळाचे विविध साहित्य, कपाट, सतरंजी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्येही या केंद्रांची निर्मिती होणार असल्याचे मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया, अंबाजोगाई, यांनी सांगितले.

का होतात बालविवाह?

बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा तसेच अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासलेला जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो. कोरोनाच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये अनेक बाल विवाह होऊ लागले आहेत. शाळा बंद आहेत. हाताला गावात काम नसल्याने इतर ठिकाणी रोजगारासाठी कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. ऊसतोडीहून परतलेल्या कामगारांकडे पैसा आला आहे. म्हणून व्यसनाधीनता बळावली. या पार्श्वभूमीवर वयात आलेल्या मुलींचे विवाह लावण्याकडे कल वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

६०१ मुलींनी घेतली शपथ

३० गावांमधील ६०१ युवतींनी आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, अशी शपथ घेतली आहे व तसे निवेदन प्रत्येक गावांतील बालविवाह प्रतिबंधक समितीला दिले आहे. जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर समितीच त्यासाठी जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन देत बालविवाह न करण्याची शपथच या मुलींनी घेतली आहे.

140821\14bed_4_14082021_14.jpg~140821\14bed_3_14082021_14.jpg~140821\14bed_2_14082021_14.jpg