शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर त्यास समितीच जबाबदार राहील,’ अशी शपथ घेत अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर ६०१ मुलींनी आत्मभानाचा निर्धार करीत शिवाय लहान वयात बोहल्यावर चढण्याआधी सामाजिक परिवर्तनाला बळ दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी अंबाजोगाईच्या मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराने ३० गावांमधून सुरू असलेली ही चळवळ व्यापक करण्यासाठी ‘मनस्विनी’च्या प्रमुख प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात २०, तर धारूर तालुक्यात १० अशा ३० गावांमध्ये निर्धार समानता प्रकल्प राबविला जात आहे. बालविवाह प्रतिबंध, हुंडा या प्रथेविरुद्ध जनजागृती, लिंगभाव समानता हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ घेत ३० गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या समितीची माहिती संपूर्ण गावकऱ्यांना व्हावी, यासाठी मनस्विनी महिला प्रकल्पाच्यावतीने गावात फलक लावलेला आहे. समितीतील सदस्यांचे क्रमांक तसेच चाईल्ड लाईन्सचा टोलफ्री क्रमांक या फलकावर लावला आहे. यामुळे जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन होते. या कालावधीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुपचुप गेटकेन विवाह होऊ लागले. यात प्रामुख्याने १२ ते १६ वर्षे वयाच्या मुलींचे विवाहदेखील जुळू लागले. अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून मनस्विनीच्या माध्यमातून गावातील समित्यांना प्रशिक्षण दिले. बालविवाह रोखण्यासाठी गावात काय उपाययोजना करता येऊ शकतात? याचे मार्गदर्शन केले तसेच बालविवाह थांबलेल्या मुलींच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कोरोना काळात मनस्विनीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी २१ बालविवाह रोखले, ही या चळवळीची जमेची बाजू म्हणावी लागेल.

१० गावांमध्ये आत्मभान केंद्रांची स्थापना

किशोरवयीन मुली व महिलांसाठी गावांमध्येच आत्मभान केंद्रांचीही सुरुवात झाली आहे. या केंद्रांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण गावातच उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील युवक-युवतींचे बालविवाह होऊ नयेत यासाठी ग्रामसमित्याही पुढाकार घेत आहेत, तर आत्मभान केंद्रात ५० विविध पुस्तके, खेळाचे विविध साहित्य, कपाट, सतरंजी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्येही या केंद्रांची निर्मिती होणार असल्याचे मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया, अंबाजोगाई, यांनी सांगितले.

का होतात बालविवाह?

बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा तसेच अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासलेला जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो. कोरोनाच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये अनेक बाल विवाह होऊ लागले आहेत. शाळा बंद आहेत. हाताला गावात काम नसल्याने इतर ठिकाणी रोजगारासाठी कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. ऊसतोडीहून परतलेल्या कामगारांकडे पैसा आला आहे. म्हणून व्यसनाधीनता बळावली. या पार्श्वभूमीवर वयात आलेल्या मुलींचे विवाह लावण्याकडे कल वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

६०१ मुलींनी घेतली शपथ

३० गावांमधील ६०१ युवतींनी आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, अशी शपथ घेतली आहे व तसे निवेदन प्रत्येक गावांतील बालविवाह प्रतिबंधक समितीला दिले आहे. जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर समितीच त्यासाठी जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन देत बालविवाह न करण्याची शपथच या मुलींनी घेतली आहे.

140821\14bed_4_14082021_14.jpg~140821\14bed_3_14082021_14.jpg~140821\14bed_2_14082021_14.jpg