शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आता १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:56 IST

नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे१७ दिवसांची मुदतवाढ : १६ हजार ९२५ शेतकऱ्यांना दिलासा

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.१ फेब्रुवारीपासून शासनाने नाफेडच्या वतीने हमीदराने तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरु केले होते. कधी गोदाम तर कधी बारदाना तर कधी तांत्रिक अडचणींमुळे तूर खरेदीत अडथळे आले होते. ७७ दिवसात १५ हजार ७६४ शेतकºयांची १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर १८ एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार ७६४ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन तूर खरेदीसाठी मुदतवाढीची गरज असल्याचे शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. अखेर देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी तूर खरेदीला मुदतवाढ दिली. हा निर्णय घेण्यास पाच दिवसांचा अवधी लागला. मुदतवाढीचे आदेश २३ रोजी सायंकाळी मिळाल्याने २४ रोजी काही केंद्रांवरच तूर खरेदी होऊ शकली. बुधवारपासून खरेदीला वेग येईल, मात्र पुरेसा बारदाणा आणि गोदामांची उपलब्धता आवश्यक आहे.मुदतवाढीत पाच दिवस वाया१८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने केंद्रचालक निवांत होते. तर तीन दिवस ताटकळलेल्या शेतकºयांनी त्यांचा माल परत घरी नेला. विस्कळीत झालेली यंत्रणा सुस्थितीत आणण्यात आली. मुदतवाढीमुळे पुन्हा तूर खरेदी सुरु होत आहे.जवळपास १६ हजार ९२५ शेतकºयांची तूर १५ मेपर्यंत खरेदी करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे आहे. तूर खरेदी वेगाने झाल्यास हे आव्हान पेलता येणार असलेतरी केंद्र सुरु झाल्यापासून गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीची गती संथ राहिली आहे.केंद्रांच्या अडचणी१८ एप्रिलपर्यंत १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यापैकी ९० हजार क्विंटल तूर गोदामाअभावी खरेदी केंद्रांवरच पडून आहे. मुदतवाढ मिळाली तरी खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची असा पेच शिरुर, अंबाजोगाई, माजलगाव येथील केंद्र चालकांपुढे पडला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीडagricultureशेती