शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

बीड जिल्हा प्रशासनापुढे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:23 IST

शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मृत साठ्याताली लघु, मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात १४४ छोटे, मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी जवळपास ३५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक नाही. ज्या प्रकल्पामध्ये पाणी साठा शिल्लक आहे, त्याठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील १४४ लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक आहे. तसेच सर्व प्रकल्प मृत साठ्यात असून पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा या प्रकल्पामधून केला जातो. बीड सह इतर मोठ्या शहरामध्ये ८ ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. पाणी उपसा अशाच पद्धतिने सुरु रहिला तर पुढील ७ ते ८ महिने कसे काढायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.प्रकल्प क्षेत्राच्या जवळपास मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे, काही ठिकाणी तोडणी सुरु झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उसाचे पिक आहे. त्यामुळे एक, दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी सांगीतले. मात्र, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाला तर शहरी व ग्रामीण भागातील नागिरकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यूत मोटार व इंजिनच्या माध्यमातून होणार पाणी उपसा रोखण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.शेतकºयांच्या पिकांचा प्रश्न असल्यामुळे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.पाणी उपसा रोखा; ग्रामपंचायतने घेतला ठरावपाटोदा तालुक्यातील मुगगांव व परिसरातील इतर गावांना इंचरणा तलावामधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र इंचरणा तलावामधून विद्यूत मोटारी व इंजिनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. तो रोखण्यात यावा यासाठी मुगगांव ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेण्यात आला आहे. तसेच तहसिल व इतर संबंधीत प्रशासकीय कार्यालयास इंचरणा तलावातून पाणी उपसा रोखण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील पाणी उपसा करणाºयांवर कुठली कारवाई केली जात नसल्याचे ग्रामपंचायने पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई