शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

बीड जिल्हा प्रशासनापुढे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:23 IST

शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मृत साठ्याताली लघु, मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात १४४ छोटे, मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी जवळपास ३५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक नाही. ज्या प्रकल्पामध्ये पाणी साठा शिल्लक आहे, त्याठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील १४४ लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक आहे. तसेच सर्व प्रकल्प मृत साठ्यात असून पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा या प्रकल्पामधून केला जातो. बीड सह इतर मोठ्या शहरामध्ये ८ ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. पाणी उपसा अशाच पद्धतिने सुरु रहिला तर पुढील ७ ते ८ महिने कसे काढायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.प्रकल्प क्षेत्राच्या जवळपास मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे, काही ठिकाणी तोडणी सुरु झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उसाचे पिक आहे. त्यामुळे एक, दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी सांगीतले. मात्र, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाला तर शहरी व ग्रामीण भागातील नागिरकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यूत मोटार व इंजिनच्या माध्यमातून होणार पाणी उपसा रोखण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.शेतकºयांच्या पिकांचा प्रश्न असल्यामुळे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.पाणी उपसा रोखा; ग्रामपंचायतने घेतला ठरावपाटोदा तालुक्यातील मुगगांव व परिसरातील इतर गावांना इंचरणा तलावामधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र इंचरणा तलावामधून विद्यूत मोटारी व इंजिनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. तो रोखण्यात यावा यासाठी मुगगांव ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेण्यात आला आहे. तसेच तहसिल व इतर संबंधीत प्रशासकीय कार्यालयास इंचरणा तलावातून पाणी उपसा रोखण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील पाणी उपसा करणाºयांवर कुठली कारवाई केली जात नसल्याचे ग्रामपंचायने पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई