शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

बीड जिल्हा प्रशासनापुढे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:23 IST

शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मृत साठ्याताली लघु, मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात १४४ छोटे, मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी जवळपास ३५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक नाही. ज्या प्रकल्पामध्ये पाणी साठा शिल्लक आहे, त्याठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील १४४ लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक आहे. तसेच सर्व प्रकल्प मृत साठ्यात असून पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा या प्रकल्पामधून केला जातो. बीड सह इतर मोठ्या शहरामध्ये ८ ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. पाणी उपसा अशाच पद्धतिने सुरु रहिला तर पुढील ७ ते ८ महिने कसे काढायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.प्रकल्प क्षेत्राच्या जवळपास मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे, काही ठिकाणी तोडणी सुरु झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उसाचे पिक आहे. त्यामुळे एक, दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी सांगीतले. मात्र, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाला तर शहरी व ग्रामीण भागातील नागिरकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यूत मोटार व इंजिनच्या माध्यमातून होणार पाणी उपसा रोखण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.शेतकºयांच्या पिकांचा प्रश्न असल्यामुळे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.पाणी उपसा रोखा; ग्रामपंचायतने घेतला ठरावपाटोदा तालुक्यातील मुगगांव व परिसरातील इतर गावांना इंचरणा तलावामधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र इंचरणा तलावामधून विद्यूत मोटारी व इंजिनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. तो रोखण्यात यावा यासाठी मुगगांव ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेण्यात आला आहे. तसेच तहसिल व इतर संबंधीत प्रशासकीय कार्यालयास इंचरणा तलावातून पाणी उपसा रोखण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील पाणी उपसा करणाºयांवर कुठली कारवाई केली जात नसल्याचे ग्रामपंचायने पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई