शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हयातीच्या दाखल्यासाठी तहसीलच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST

बीड : दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ...

बीड : दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. १० एप्रिलपासून हयात प्रमाणपत्र स्वीकारले जाईल, असे तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी आधारकार्ड, एक फोटो आणि बँकेचे पासबूक अर्जासोबत जोडून सदरील अर्ज तलाठी, नगरसेवक, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यापैकी एकाच्या सहीने तहसील कार्यालयात सादर करावे लागते. परंतु, सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरीदेखील जिल्ह्यातील जवळपास सर्वच तहसील कार्यालयांत हे अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

बहुतांशवेळा सही आणि शिक्क्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत, असेही काही लाभार्थ्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र सादर केले की, तहसील कार्यालय संबंधित लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांमध्ये सादर करते. त्यानंतर लाभार्थ्यांना बँकेत पैसे मिळतात. काही लाभार्थी बँकेत जात आहेत. परंतु, यादीच आली नाही, असे कारण सांगून पैसे देण्यास नकार दिला जातो. यामुळे लाभार्थ्यांची परवड होत असून याकडे लोकप्रतिनीधी व जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी होत आहे.

हयात प्रमाणपत्र घेणार तरी कधी ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाने हयात प्रमाणपत्र घेणे बंद केले आहे. यामध्ये संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी हे लाभार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांना कधीपर्यंत हयात प्रमाणपत्र मिळेल, याविषयी एकाही तहसील कार्यालयात फलक लावलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र कधी मिळणार, याविषयी संभ्रमावस्था कायम आहे.

प्रतिक्रिया

श्रावणबाळ, इंदिरा गांधी आणि संजय गांधी या योजनांतील पैसे काढण्यासाठी हयात प्रमाणपत्र बंधनकारक आहे. परंतु, हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तहसीलमधील दलालांना पैसे दिले की, ते मिळते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र, सहज प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत.

लोचना खंडागळे लाभार्थी

हयात प्रमाणपत्र आणि बँकेचा काहीही संबंध नाही. ऑक्टोबरपर्यंतचा लाभ दिला गेला आहे. दरम्यान, त्यानंतर शासनाकडूनच बजेट आलेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले नाहीत, अशी माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.