२० ऑगस्ट रोजी ४ हजार २२१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार १०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ११५ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ०६, आष्टी तालुक्यात ४४, बीड तालुक्यात १२, धारुरमध्ये १७, गेवराईत ०५, केजमध्ये १३, माजलगावात ०३, परळीत ०१, पाटोदा ०८, शिरुरमध्ये ०२, वडवणीत ०४ नवे रुग्ण आढळून आले. चोवीस तासांत दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. शिरुर तालुक्यातील वारणी येथील ५५ वर्षीय पुरुष आणि आष्टी तालुक्यातील शिराळा येथील ५२ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. दिवसभरात ११२ जणांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, एकूण बाधितांची संख्या १ लाख ३५९ हजार इतकी झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ९५ हजार ८३८ इतका आहे. आतापर्यंत २ हजार ६९० इतकी झाली आहे. सध्या १ हजार ८३१ रुग्ण उपचार घेत आहेत.