शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परळी जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तत्कालीन कृषी अधीक्षकाची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:20 IST

याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे परळी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात ४ कोटी ८४ लाख रूपयांचा घोटाळा झाला.या प्रकरणाशी संबंधित कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

बीड : परळी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात ४ कोटी ८४ लाख रूपयांचा घोटाळा झाला. याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून कृषी आयुक्तांना एका पत्राद्वारे  विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एका विशेष पथकाची नियुक्ती करुन घोटाळ्यातील तथ्य बाहेर काढण्यात येणार आहे.कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कामांच्या चौकशीत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून आले होते.

या प्रकरणाशी संबंधित कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. चौकशी पथकाने शासनाकडे सोपवलेल्या अहवालावरून कृषी विभागाने रमेश भताने यांच्यासह सर्व दोषींची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील नियम) नुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य आयुक्त  कृषी आयुक्तालय, पुणे यांना दिले आहेत. या चौकशीनंतर जलयुक्त घोटाळ््यात आणखी काही बडे मासे गळाला लागतात का ? याकडे सगळ््यांचे लक्ष लागलेले आहे. 

पारदर्शक चौकशीसाठी झाली बदलीबीडचे तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांची बदली लातूर येथे विभागीय कृषी सहसंचालक या पदावर झाली होती. मात्र, या प्रकरणामध्ये भताने यांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाल्याने त्यांची बदली नाशिक येथे विभागीय कृषी सहसंचालक पदावर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारCorruptionभ्रष्टाचारState Governmentराज्य सरकार