शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोबीला एक रुपयाचा भाव, काढायलाही परवडेना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. पात्रूड येथील शेतकऱ्याने शेतात कोबीची लागवड केली; परंतु कोबीला बाजारपेठेत किलोला केवळ एक रुपयाच भाव मिळत असल्याने ती काढायला देखील परवडत नसल्याने ही कोबी शेतातच सुकू लागली आहे.

माजलगाव - पात्रूड या रस्त्यावर पात्रूड येथील शेतकरी अशोक नारायणराव आगरकर यांची तीन एकर शेती आहे. या शेतीवर सहा व्यक्तींची उपजीविका भागवली जाते. वर्षानुवर्षे वडिलोपार्जित या शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. अशोक आगरकर हे आपल्या शेतात वांगी, कोबी, पालक, कोथिंबीर, भोपळा आदी भाजीपाल्याची पिके घेत असतात. यातून खर्च जाऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असे. मागील वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना असाच भाजीपाला, फळे फेकून द्यावी लागली होती. यावर्षी परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरण, तलाव, नद्या, नाले भरून वाहू लागले होते. पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव गडगडले. यामुळे शेतकऱ्यांना लागलेल्या भाजीपाल्यातून वाहतुकीचाही खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.

पात्रूड येथील शेतकरी अशोक आगरकर यांनी अर्धा एकर शेतात कोबीची लागवड केली होती. बाजारपेठ कोबीला एक रुपया किलो भाव असल्याने त्या कोबीच्या रोपांचाही खर्च निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने या कोबीला फवारणी देखील केली नाही. त्यामुळे या कोबीला मोठ्या प्रमाणावर कीड लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. याच बरोबर या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व कोथिंबिरीचीही लागवड केली होती. त्या दोन्हींलाही भावच नसल्याने व हातात पैसेच येत नसल्याने पुढील वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यास पडला आहे.

शेतकऱ्यांच्या पीक, भाजीपाल्याला भावच नसल्याने आता कधी शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन येणार, असा प्रश्न पडला आहे. यावर्षी शेतीतून आमचा खर्चच निघणे मुश्कील झाल्याने मुलांचे शिक्षण कसे करावे व काय खावे. यामुळे झोप उडाली आहे.

----अशोक आगरकर, शेतकरी

===Photopath===

280321\4341img_20210328_122640_14.jpg