शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कोबीला एक रुपयाचा भाव, काढायलाही परवडेना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. पात्रूड येथील शेतकऱ्याने शेतात कोबीची लागवड केली; परंतु कोबीला बाजारपेठेत किलोला केवळ एक रुपयाच भाव मिळत असल्याने ती काढायला देखील परवडत नसल्याने ही कोबी शेतातच सुकू लागली आहे.

माजलगाव - पात्रूड या रस्त्यावर पात्रूड येथील शेतकरी अशोक नारायणराव आगरकर यांची तीन एकर शेती आहे. या शेतीवर सहा व्यक्तींची उपजीविका भागवली जाते. वर्षानुवर्षे वडिलोपार्जित या शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. अशोक आगरकर हे आपल्या शेतात वांगी, कोबी, पालक, कोथिंबीर, भोपळा आदी भाजीपाल्याची पिके घेत असतात. यातून खर्च जाऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असे. मागील वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना असाच भाजीपाला, फळे फेकून द्यावी लागली होती. यावर्षी परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरण, तलाव, नद्या, नाले भरून वाहू लागले होते. पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव गडगडले. यामुळे शेतकऱ्यांना लागलेल्या भाजीपाल्यातून वाहतुकीचाही खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.

पात्रूड येथील शेतकरी अशोक आगरकर यांनी अर्धा एकर शेतात कोबीची लागवड केली होती. बाजारपेठ कोबीला एक रुपया किलो भाव असल्याने त्या कोबीच्या रोपांचाही खर्च निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने या कोबीला फवारणी देखील केली नाही. त्यामुळे या कोबीला मोठ्या प्रमाणावर कीड लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. याच बरोबर या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व कोथिंबिरीचीही लागवड केली होती. त्या दोन्हींलाही भावच नसल्याने व हातात पैसेच येत नसल्याने पुढील वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यास पडला आहे.

शेतकऱ्यांच्या पीक, भाजीपाल्याला भावच नसल्याने आता कधी शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन येणार, असा प्रश्न पडला आहे. यावर्षी शेतीतून आमचा खर्चच निघणे मुश्कील झाल्याने मुलांचे शिक्षण कसे करावे व काय खावे. यामुळे झोप उडाली आहे.

----अशोक आगरकर, शेतकरी

===Photopath===

280321\4341img_20210328_122640_14.jpg