शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवरीचा मामा म्हणून मिरवला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:15 IST

गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देविनापरवानगी लग्न लावणे पडले महागात  बीड जिल्ह्यात वधूपिता, मामासह वऱ्हाडींवर गुन्हा दाखल 

बीड : आष्टी तालुक्यातील कारखेल येथे विनापरवानगी आणि ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवून विवाह लावल्याप्रकरणी वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळींवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २९ जून रोजी झालेल्या या विवाहाची माहिती ५ जुलै रोजी प्रशासनाला समजली. यावरून प्रशासन किती गाफिल आहे, याची प्रचिती येते. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना हा प्रकार समोर आला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. 

पनवेल येथून एक जण कारखेल येथे आला होता. आल्यानंतर त्याने क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. परंतु तो अहमदनगरला गेला. नंतर कारखेल येथीलच आपल्या भाचीच्या लग्नात उपस्थित राहिला. नंतर तो दोन दिवसांनी पॉझिटिव्ह आला. नवरीचा मामा असल्याने तो सर्वत्र मिरवल्याने अनेकांशी त्याचा संपर्क आला. हा विवाह देखील विनापरवानगी लावल्याचे चौकशीतून समोर आले.  त्यामुळे वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळीवर ग्रामसेवक अशोक खाकाळ यांच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारावरून ग्रामसेवकांचेही गावात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. 

मामावर होम क्वारंटाईन नियम तोडल्याचा गुन्हापनवेलहून आल्यानंतर होम क्वारंटाईन न राहता सर्वत्र फिरून इतर लोकांशी संपर्क केल्याने वधूचा मामा आणि नगर येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर वेगळा गुन्हा नोंद केला आहे. यातही खाकाळ हेच फिर्यादी आहेत. २९ तारखेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लोकांमध्ये विवाह झाल्याची माहिती समितीला नसणे, हे संशयास्पद आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगने दक्षता समिती व ग्रामसेवकाच्या कारभाराचा पर्दाफाश केला. प्रत्येक गावात दक्षता समिती तयार केली आहे. ५ जुलै रोजी आपल्याला माहिती समजल्याचे ग्रामसेवकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. २९ जून ते ५ जुलै दरम्यान हा प्रकार का समोर आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड