शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

वीट उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ...

अंबाजोगाई : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीट उत्पादनांचा व्यवसाय संकटात सापडलेला असताना वाढीव भावामुळे व्यवसाय मंदावले आहेत. अशा स्थितीत शासनाने राखेचे भाव नियंत्रित ठेवावेत, अशी मागणी वीट उत्पादक व्यावसायिकांकडून होत आहे.

वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी

अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमण काळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीज दर वाढविण्यात आले आहेत. वीज बिलांच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात वीज बिल तर माफ केलेच नाही. उलट वाढीव दर ठरवून वीज आकारणी सुरू केली आहे. वाढते वीज बिल ग्राहकांना परवडणारे नाही. यासाठी रीडिंगप्रमाणे बिल देऊन इतर अधिभार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.

कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली असली तरी शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत.

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात बस वाहतूक सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध नाही. इतर वाहनांनाही बंदी करण्यात आल्याने व बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णालयापर्यंत जायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बसफेऱ्या बंद झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे.

कामे उपलब्ध करून द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, सध्या रब्बी हंगाम संपुष्टात आल्याने शेतमजुरांना कामे नाहीत. त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे शहरी भागातीलही बांधकाम व विविध व्यवसाय बंद झाल्याचा मोठा फटका मजूर वर्गाला बसत आहे. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धायगुडे यांनी केली आहे.