शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी मागितली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

माजलगाव : मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी लाच मागणाऱ्या तलाठी पतीवर गुन्हा नोंदविण्याची तसेच तलाठ्यास निलंबित करण्याची मागणी शेकापने तहसीलदारांकडे ...

माजलगाव : मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी लाच मागणाऱ्या तलाठी पतीवर गुन्हा नोंदविण्याची तसेच तलाठ्यास निलंबित करण्याची मागणी शेकापने तहसीलदारांकडे केली आहे.

तालुक्यातील छत्र बोरगाव येथील तलाठी पी. बी. आठवले यांचा कारभार त्यांचे पती सूरज हे पाहत असतात. बुधवारी छत्र बोरगाव येथील शेतकरी राजेभाऊ रामभाऊ जाधव हे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे न्यायालयातून मिळालेल्या वारस प्रमाणपत्र आधारे ७/१२ पत्रकावर नाव नोंदण्यासाठी, फेरफार नोंदणीसाठी तलाठी आठवले यांच्या कार्यालयात गेले असता तेथे दोघे पती - पत्नी हजर होते. राजेभाऊ जाधव यांनी न्यायालयाचे प्रमाणपत्र देऊन नाव सातबारा पत्रकाला नोंदविण्याची विनंती केली असता, तलाठी आठवले यांनी त्यांच्या पतीला भेटा असे सांगितले. तेव्हा सूरज रक्षे यांनी तुम्हाला आठ हजार रुपये द्यावे लागतील, आज नगदी चार हजार रुपये द्या व आठ दिवसांनंतर चार हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्यावर राजेभाऊ जाधव यांनी त्यांना चार हजार रुपये दिले. यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्याला घेऊन तहसील कार्यालय गाठले. तलाठ्यास निलंबित करून तलाठी पतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेकापचे भाई ॲड. नारायण गोले पाटील, राजेभाऊ जाधव, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, आदींनी दिला.