शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

बीडमध्ये बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान सर्व मंडळातील शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरकारला अन्यायकारी निर्णयात बदल करावा लागला असून आता जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकºयांना बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ...

ठळक मुद्दे६३ मंडळात ३ लाख ७७ हजार हेक्टरातील कपाशीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरकारला अन्यायकारी निर्णयात बदल करावा लागला असून आता जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकºयांना बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

बीड जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामातही कापसाचे क्षेत्र वाढले होते. परंतू गुलाबी सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतक-यांना पहिल्या वेचणीनंतर उत्पादन मिळाले नाही. तसेच या वेचणीतही अत्यंत कमी उतारा मिळाला होता. हिवाळी अधिवेशनात बोंडअळीचा मुद्दा गाजला होता. यावेळी कृषी मंत्र्यांनी सरसकट मदतीची घोषणा केली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले होते. शंभर टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे या पंचनाम्यावरुन स्पष्ट झालेले असताना २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात पीक कापणी प्रयोगानुसार कृषी विभागाकडून आलेल्या अहवालानुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मिळाले. त्यानुसार जिल्ह्यातील ६३ पैकी २० महसूल मंडळच या मदतीसाठी पात्र ठरले. त्यामुळे शेतकºयांवर मोठा अन्याय होणार होता. तसेच कृषी आणि महसूल यंत्रणेचे अहवालही या निर्णयामुळे खोटे असल्याचा संदेश जनमानसात पोहचत होता. शासनाच्या या निर्णयानंतर जिल्हाभरात सर्वच राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनी आंदोलने केली.

जिल्हा प्रशासनाकडूनही जनभावना कळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शासनाला माघार घ्यावी लागली. अखेर १७ मार्च रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी बाधित शेतकºयांना मदत अनुज्ञेय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळातील शेतकरी पात्र ठरणार आहेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र