शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद मिळावी म्हणून क्षीरसागर पराभवाचे खापर भाजपवर फोडत आहेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 13:52 IST

भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा आरोप 

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर निवडून यावे असे वाटत नव्हतेपराभवासाठी शहरातील खड्डे ठरले कारणीभूत

बीड : विधानसभेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावेत यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मला वा भाजपच्या एकही जबाबदार पदाधिकाऱ्यांना फोन केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर निवडून यावेत, असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना वाटत होते का, अशी शंका आहे, तसेच पराभवाचे खापर भाजपवर फोडून विधान परिषद मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रपरिषदेत केला.

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप नेते राजेंद्र मस्के, जि. प. सदस्य अशोक लोढा, स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगाजे आदींची उपस्थिती होती. चिंतन बैठकीमध्ये भाजपमुळेच पराभव झाल्याचे खोडसाळ मत व्यक्त केले गेले. क्षीरसागरांच्या घरातच समन्वयाचा अभाव होता. त्यांचे काम करा, असा एकही संदेश किंवा फोन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपच्या एकाही जबाबदार पदाधिकाऱ्यांला केला नाही, त्यामुळे नेमका पराभव का झाला याचे उत्तर क्षीरसागर यांनी शोधावे. खापर भाजपवर फोडू नये. पंकजा मुंडे यांच्या आदेशाने आम्ही जीव तोडून प्रयत्न केल्याचा दावा  त्यांनी केला.

पराभवासाठी शहरातील खड्डे ठरले कारणीभूतशहरभर सर्वत्र खड्डे पडलेले होते. यापूर्वीच्या निवडणुकांत रात्रीतून रस्ते केले जात, तशी तगडी यंत्रणा त्यांच्याकडे असूनही खड्डे का बुजवले नाहीत. क्षीरसागर यांच्या पराभवासाठी हे जाणीवपूर्वक केल्याचा गंभीर आरोप पोकळे यांनी केला. क्षीरसागर यांनीही भाषणात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच मतदानात खड्डे पडल्याचा उल्लेख केला. परंतु, त्यांना बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्याविषयी थेट बोलता आले नाही. हा सर्व विधान परिषद मागण्यासाठी खटाटोप असल्याचेही  पोकळे म्हणाले. 

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरBeedबीडShiv Senaशिवसेना