शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नियोजनशून्य लोडशेडींगवर भाजप आमदार आक्रमक, महावितरणला विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:28 IST

अंबाजोगाई, केजमध्ये वीजचोरी नसतानाही दहा-दहा तास वीज गायब

अंबाजोगाई - रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान महिना असे सणासुदीचे दिवस सुरु असताना मागील आठवड्यापासून अंबाजोगाई आणि केज तालुक्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले. उन्हामुळे असह्य उकाडा आणि अनियंत्रित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत. कुठलेही वेळापत्रक न देता दिवसातून आठ ते दहा तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बुधवारी (दि.१३) अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय गाठले आणि जाब विचारला. वसुलीचे प्रमाण चांगले आणि वीजचोरी कमी असलेल्या ठिकाणी भारनियमन करण्यात येणार नाही अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी दिली. 

वीज उत्पादनात तुट निर्माण झाल्याचे कारण पुढे करत आठ दिवसापूर्वी महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले. या भारनियमनाला कसलेही वेळापत्रक नाही. रात्री-अपरात्री, पहाटे, दुपारी अशी कोणत्याही वीजपुरवठा खंडित केला जातो. दिवसभरात एकूण आठ ते दहा तास भारनियमन केले जाते. आधीच वाढलेल्या तापमानामुळे असह्य उकाडा आणि त्यात नियोजनशून्य भारनियमन यामुळे महिला, बालकांसह व्यापारी, शेतकरी सर्वच हवालदिल आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अंबाजोगाई, केज वगळता शेजारच्या काही तालुक्यात आणि लातूरसारख्या जिल्ह्यात मात्र एवढे तुघलकी आपत्कालीन भारनियमन नाही. त्यामुळे महावितरण विरोधात रोष वाढलेला आहे. 

याच पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांनी कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. अंबाजोगाई, केज या शहरातील नागरिकांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९५% वीजबिलांची वसुली दिली, तसेच या दोन्ही ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण नगण्य आहे. जिथे वसुली चांगली आणि वीजचोरी नसते त्या ठिकाणी भारनियमन करू नये असे निर्देश असतानाही या दोन शहरांना का वेठीस धरले जात आहे असा सवाल आ. मुंदडा यांनी केला. तसेच झाडांच्या फांद्या, तारांचे झोळ यामुळेही वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो. शेतीपंपाला आठ तास वीज पुरवठा देण्याचे निर्देश आहेत, मात्र नेमके त्याच वेळी लोडशेडींग करण्यात येते. त्यामुळे शेतीपंपाला अवघे २-३ तास वीज मिळत आहे याबाबतही आ. मुंदडा यांनी जाब विचारला. यावर वसुलीचे प्रमाण चांगले आणि वीजचोरी कमी असलेल्या ठिकाणी भारनियमन करण्यात येणार नाही अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणelectricityवीज