शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:19 IST

बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड जि.प.च्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रवादीचे ६ बंडखोर सदस्य अपात्र

बीड : बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड जि.प.च्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सहा सदस्यांत माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाचे ५, तर आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

अपात्र ठरलेल्या या सहा सदस्यांमध्ये शिवाजी एकनाथ पवार, (रा. झापेवाडी, ता. शिरूर), प्रकाश विठ्ठल कवठेकर (रा. उखंडा, ता. पाटोदा), अश्विनी ज्ञानेश्वर जरांगे (रा. कुसळंब, ता. पाटोदा), संगीता रामहरी महारनोर (रा. दादेगाव, ता. आष्टी), मंगल गणपत डोईफोडे (रा. ईट पिंपळनेर, ता. बीड), अश्विनी अमर निंबाळकर (रा. आष्टा हरिनारायण, ता. आष्टी) यांचा समावेश आहे.बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६० पैकी सर्वाधिक २५ जागा राष्ट्रवादीने, तर त्याखालोखाल १९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेना आणि शिवसंग्रामने प्रत्येकी ४, काकू-नाना आघाडी-३ अपक्ष २ तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.

अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत राजकीय घडामोडी वेगाने होत राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्या गटाचे ५ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा १ अशा सहा जणांनी बंडखोरी करीत भाजपला साथ दिली. यापैकी धस गटाच्या पाच जणांनी भाजप आघाडीला मतदान केले, तर क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे या आजारी असल्याचे कारण दाखवीत सभागृहात अनुपस्थित राहिल्या. शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी ४, काँग्रेस १, राष्ट्रवादीचे बंडखोरीचे ५ यांना साथीला घेत भाजपने ३४ विरुद्ध २५ अशा फरकाने सत्ता काबीज केली होती. जि.प. अध्यक्षपदासाठी भाजपच्या सविता विजय गोल्हार यांनी मंगला प्रकाश सोळंके यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांनी शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांचा पराभव केला होता.

या निकालाविरुद्ध पक्षांतर विरोधी कायद्याचा भंग केला म्हणून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, पराभूत उमेदवार मंगला सोळंके आणि अजय मुंडे यांनी या सहा जणांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत या सर्वांना अपात्र घोषित करावे, अशी याचिका दाखल केली होती. अखेर सुनावणीनंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी १६ आॅक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढीत या सर्वांना अपात्र ठरविले आहे.