शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या मळीपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ ...

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत. यावर पर्यायी उपाय म्हणून गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याने घट्ट मळी म्हणजेच प्रेसमडपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. हे खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल व तसेच याचा उपयोग कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग तसेच डाळिंब, मोसंबी फळबागेस होणार आहे.

मळीपासूनचे बायो कम्पोस्ट खत शेतीत फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी व उसाच्या उत्पादनात भरघोस वाढीसाठी बायो कम्पोस्ट खत उत्पादन करणाऱ्या मशीनचे उद्घाटन कारखान्याचे संचालक भास्करराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, जगन्नाथराव दिवाण, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, ऊस पुरवठा अधिकारी सुदाम पघळ, अधीक्षक आर. बी. ठोसर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बायो कम्पोस्ट खतातील प्रमुख सेंद्रिय अन्नद्रव्यामुळे प्रतिएकरी उत्पादनात भरघोस वाढ होते.

वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची गरज राहत नाही.

खतांमध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर असल्यामुळे कीड व रोगासाठी ऊस पिकामध्ये प्रतिकारक्षमता वाढते.

उसाची उगवण, एकसमान जोमदार फुटवे फुटण्याची क्षमता व कांड्याची लांबी व जाडीमध्ये भरघोस वाढ होते. या प्रेसमडचे रासायनिक पृथक्करण केले असता १.५ ते १.७ टक्के नत्र, १.५ ते. ६ टक्के स्फुरद, १.० ते ५.२ टक्के पालाश आणि २ ते २.३ टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात. तसेच कम्पोस्ट खतामध्ये गंधकाचे प्रमाण असल्याने चोपन जमीन सुधारण्यास याचा उपयोग होतो. या खताचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित व माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो. हे कम्पोस्ट खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले.