शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

उसाच्या मळीपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ ...

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत. यावर पर्यायी उपाय म्हणून गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याने घट्ट मळी म्हणजेच प्रेसमडपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. हे खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल व तसेच याचा उपयोग कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग तसेच डाळिंब, मोसंबी फळबागेस होणार आहे.

मळीपासूनचे बायो कम्पोस्ट खत शेतीत फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी व उसाच्या उत्पादनात भरघोस वाढीसाठी बायो कम्पोस्ट खत उत्पादन करणाऱ्या मशीनचे उद्घाटन कारखान्याचे संचालक भास्करराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, जगन्नाथराव दिवाण, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, ऊस पुरवठा अधिकारी सुदाम पघळ, अधीक्षक आर. बी. ठोसर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बायो कम्पोस्ट खतातील प्रमुख सेंद्रिय अन्नद्रव्यामुळे प्रतिएकरी उत्पादनात भरघोस वाढ होते.

वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची गरज राहत नाही.

खतांमध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर असल्यामुळे कीड व रोगासाठी ऊस पिकामध्ये प्रतिकारक्षमता वाढते.

उसाची उगवण, एकसमान जोमदार फुटवे फुटण्याची क्षमता व कांड्याची लांबी व जाडीमध्ये भरघोस वाढ होते. या प्रेसमडचे रासायनिक पृथक्करण केले असता १.५ ते १.७ टक्के नत्र, १.५ ते. ६ टक्के स्फुरद, १.० ते ५.२ टक्के पालाश आणि २ ते २.३ टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात. तसेच कम्पोस्ट खतामध्ये गंधकाचे प्रमाण असल्याने चोपन जमीन सुधारण्यास याचा उपयोग होतो. या खताचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित व माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो. हे कम्पोस्ट खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले.