शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

उसाच्या मळीपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ ...

गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत. यावर पर्यायी उपाय म्हणून गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याने घट्ट मळी म्हणजेच प्रेसमडपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. हे खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल व तसेच याचा उपयोग कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग तसेच डाळिंब, मोसंबी फळबागेस होणार आहे.

मळीपासूनचे बायो कम्पोस्ट खत शेतीत फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी व उसाच्या उत्पादनात भरघोस वाढीसाठी बायो कम्पोस्ट खत उत्पादन करणाऱ्या मशीनचे उद्घाटन कारखान्याचे संचालक भास्करराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, जगन्नाथराव दिवाण, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, ऊस पुरवठा अधिकारी सुदाम पघळ, अधीक्षक आर. बी. ठोसर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बायो कम्पोस्ट खतातील प्रमुख सेंद्रिय अन्नद्रव्यामुळे प्रतिएकरी उत्पादनात भरघोस वाढ होते.

वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची गरज राहत नाही.

खतांमध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर असल्यामुळे कीड व रोगासाठी ऊस पिकामध्ये प्रतिकारक्षमता वाढते.

उसाची उगवण, एकसमान जोमदार फुटवे फुटण्याची क्षमता व कांड्याची लांबी व जाडीमध्ये भरघोस वाढ होते. या प्रेसमडचे रासायनिक पृथक्करण केले असता १.५ ते १.७ टक्के नत्र, १.५ ते. ६ टक्के स्फुरद, १.० ते ५.२ टक्के पालाश आणि २ ते २.३ टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात. तसेच कम्पोस्ट खतामध्ये गंधकाचे प्रमाण असल्याने चोपन जमीन सुधारण्यास याचा उपयोग होतो. या खताचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित व माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो. हे कम्पोस्ट खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले.