शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST

बीड : काकू-नाना विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण ...

बीड : काकू-नाना विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर आज परत चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.

सापत्न वागणूक मिळू लागल्याचे कारण सांगत काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर शुक्रवारी नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैय्यासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रा. जगदीश काळे, दिलीप गोरे, दिनकर कदम, विलास बडगे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, गणपत डोईफोडे, सादेक जमा, दादासाहेब मुंडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत उभी फूट पडली आहे. २० पैकी ८ नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे.

यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, आघाडीचा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. आम्ही जवळचा, लांबचा न पाहता विरोधी नगरसेवकांच्या वाॅर्डातसुद्धा कामे करून दाखवली आहेत, केवळ विकासकामांच्या मुद्द्यावरच आज या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारांनीदेखील सावध भूमिका घेऊन विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. यावेळी चारही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

राजकारणात काम करताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते. घरात मोठ्यांचा मान ठेवणे ही संस्कृती आहे. पदासाठी रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का, असा सवाल करत ३५ वर्षांपासून मी नगराध्यक्ष आहे. मलाही आमदारकीसाठी अडून बसता आले असते, पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मोठ्यांचा मान राखायला हवा. अण्णांसारखे शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ. चुका सुधारून मतदारांचा विश्वास संपादन करू, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.