शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

मोठे बाळ, गर्भपिशवी सैल झाल्याने मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:00 IST

मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला,

ठळक मुद्देमाता मृत्यू अन्वेषण समितीचे स्पष्टीकरण : डॉक्टर, परिचारिकेची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला, असा खुलासा डॉक्टर, परिचारीकांनी केला आहे. सोमवारी तातडीने माता मृत्यू अन्वेषण समितीने चौकशी केल्यानंतर हा खुलासा समोर आला आहे.माजलगाव ग्रामीण रूग्णालयात मिरा एखंडे यांचा दोन दिवसांपूर्वी प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला होता. यात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मिरा व गभातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर सोमवारी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी संबंधित डॉक्टर रूद्रवार व परिचारीकांना बीडला बोलावून घेत चौकशी केली. मातेचा मृत्यू झाल्यानंतर अन्वेषण समितीकडून चौकशी केली जाते. त्याप्रमाणे डॉ.थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सचिव डॉ.संजय कदम, डॉ.सतीष हरीदास, डॉ.राठोड, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.शहाणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.पारखे यांच्या समितीने सर्वांची चौकशी केली. यामध्ये त्याने सर्व खुलासा केला.शुक्रवारी दुपारी २ वाजता मिरा या ग्रामीण रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांची तपासणी करून रात्री त्यांना प्रसुतीगृहात घेतले. दहाव्यांदा प्रसुती असल्याने त्यांची प्रकृती आगोदरच चिंताजनक होती. तरीही डॉक्टरांनी त्यांची प्रसुती करण्यास सुरूवात केली. बाळ मोठे असल्याने सुरूवातीला केवळ डोके बाहेर आले. त्यामुळे खांदा आडकला आणि बाळ गुदमरून दगावले. त्यानंतर पिशवी सैल होऊन अकुंचण पावणे नैसर्गिक असते. मात्र ती आकुंचन पावली नाही. इंजेक्शनसह सर्व उपचार केले, मात्र ती न झाल्याने रक्तस्त्राव झाला. रक्तही चढविले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यांना बीडला हलविणेही जोखमीचे असल्याने येथेच उपचार केल्याचा खुलासा डॉक्टरांनी समितीसमोर केला. समितीने हा सर्व अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.वर्षभरात ९ मातांचा मृत्यू२०१८ या वर्षात जिल्ह्यात ९ मातांचा मृत्यू झाल्याचा आकडा आरोग्य विभागाकडे आहे. या सर्वांचा अहवाल एका निर्गमित अर्जाद्वारे वरिष्ठांना पाठविलेला आहे. त्यानंतर उपाययोजनांना गती दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू