शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बीडमध्ये फेरफार नकलेसाठी अभिलेख कक्षात मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:11 IST

शेतक-यांना पीक कर्ज तसेच इतर आवश्यक कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. मात्र, तहसील कार्यालयातून फेरफार मिळविण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : पीक कर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने होतेय अडवणूक, दलालांना मिळाली संधी, यंत्रणेचे दुर्लक्ष

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतक-यांना पीक कर्ज तसेच इतर आवश्यक कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. मात्र, तहसील कार्यालयातून फेरफार मिळविण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय तात्काळ नक्कल प्राप्त करण्यासाठी दलालामार्फत प्रत्येक नकलेसाठी १०० ते ५०० रूपये द्यावे लागत असल्याची माहिती या कामासाठी आलेल्या शेतक-यांनी दिली.जिल्ह्यातील सर्वच बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. बॅँकाच्या वाढत्या जाचक अटी व शर्तींमुळे अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासाठी शेतक-यांना संबंधित शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. खेटे घालण्याबरोबरच काही अधिकारी कर्मचा-यांकडून शेतक-यांची आर्थिक लूट देखील केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. फेरफार नकलेसाठी रीतसर पद्धतीने अर्ज करून तेसच आवश्यक कागदपत्रे देऊन देखील नक्कल देण्यासाठी १०० ते ३०० रूपये घेतले जात आहेत. पीक कर्ज मिळण्याची मुदत पुढील काही दिवस शिल्लक असल्यामुळे फेरफार तात्काळ मिळवण्यासाठी पैसे देत आहेत. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही.फेरफारचे जुने दस्तावेज तलाठी कार्यालयाकडून तहसील कार्यालयात जमा केलेले असतात. त्यामुळे फेरफार नक्कल पाहिजे असेल तर अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर फेरफारची नक्कल देण्यात येते. काही शेतकºयांच्या म्हणण्याप्रमाणे काही महिन्यापूर्वी ५० रूपये घेतले जात होते. मात्र, मागील काही दिवसांपासून १०० ते ३०० रूपये घेतले जात आहेत. घेतलेल्या पैशाची पावती किंवा पुरावा दिला जात नाही. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांशी संपर्क केला असता दोघांचा संपर्क झाला नाही.जिल्ह्यातील ११ तहसील कार्यालयांत फेरफार नक्कल मिळवण्यासाठी गर्दी पहायला मिळत आहे. येथे देखील अधिकारी कर्मचाºयांकडून पैसे उकळले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रांसाठी जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तहसील कार्यालयांमधील हे गैरप्रकार रोेखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच फेरफार नक्कल लवकरात लवकर मिळावी अशी शेतकºयांची मागणी आहे.दलालामार्फत तात्काळ नक्कलनक्कल मिळवण्यासाठी कार्यालयाबाहेर अनेक शेतकरी उभा आहेत. त्यामुळे अनेक वेळ रांगेमध्ये ताटकळत उभे राहवे लागत आहे.यावेळी बाहेरच्या दलालांमार्फत नक्कल घेतली तर रांगेत उभे राहवे लागत नाही व वेळ देखील वाचतो.त्यामुळे तहसील कार्यालयाबाहेर बसलेल्या काही ठराविक दलालांमार्फत फेरफार नक्कल तात्काळ मिळवून देण्यासठी शेतकºयांकडून ४०० ते ५०० रूपये घेतले जातात.धक्कादायक बाब म्हणजे फेरफार नक्कल घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे न देता फक्त गट नंबर सांगितला तरी देखील दलालामार्फत फेरफार नक्कल तात्काळ उपलब्ध करून दिली जाते.जुने दस्तावेज लवकर सापडेनाततलाठी कार्यालयाकडून १९६० पासूनचे फेरफार दस्तावेज तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत.मात्र, या कार्यालयात कर्मचा-यांची अपुरी संख्या व अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे यामुळे आवश्यक कागदपत्रे लवकर सापडत नाहीत.अर्ज दिल्यापासून ५ ते १० दिवसांनी शेतक-यांना फेरफार नक्कल दिली जाते. त्यामुळे अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. यामुळे पैसा आणि वेळ नाहक खर्ची पडत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड