शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भैय्यू महाराजांचे अंबाजोगाईशी होते भावनिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:29 IST

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते.

ठळक मुद्देइथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे  अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते. इतकेच नाही तर इथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते. अंबाजोगाईकरांशी त्यांच्या जुळलेल्या नात्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता धडकताच अंबाजोगाईकरही सुन्न झाले. त्यांच्या सहवासातील अनेक अठवणींना उजाळा मिळाला.

अंबाजोगाई हे प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे. अंबाजोगाईच्या परिसरात डोंगरदऱ्यात व जंगलात शिवालयांची व मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आद्यकवी मुकुंदराज, संत सर्वज्ञ दासोपंत यांचा अध्यात्मिक वारसा शहराची महती जगभर प्रसिद्ध करतो. आजतगायत अनेक त्यागी महापुरूषांना अंबाजोगाईत ज्ञानप्राप्त झाल्याचे सांगितले जाते.आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांचाही अंबाजोगाईशी संपर्क आला व त्यांचे अंबाजोगाईकरांशी भावनिक नाते जुळले. १९९९ ते  २००० या कालवधीत भैय्यूजी महाराज यांनी अंबाजोगाई परिसरातील डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या रेवलनाथ, नागनाथ, बुट्टेनाथ या शिवालयांमध्ये अनेकवेळा अनुष्ठान केले.

आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी संत सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहरातील काशीविश्वनाथ मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सकलेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांना ते सातत्याने भेटी देत असत. भय्यूजी महाराज हे स्वत: शिवभक्त असल्याने अंबाजोगाई परिसरातील विविध शिवालयांशी त्यांचे धार्मिक नाते जुळले होते. या मंदिरांविषयी त्यांना कमालीची ओढ होती. अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात वनस्पती औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पती उपयोगात आणण्यासाठी या भागात आयुर्वेद रूग्णालय स्थापन करण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांची ही इच्छा अधुरीच राहिली.

भैय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाई येथील भक्त अर्जुन वाघमारे व रोहित देशमुख हे त्यांच्यासोबत अंबाजोगाई व परिसरात सावलीसारखे फिरत.  अंबाजोगाईचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी भैय्यूजी महाराजांच्या मनात अनेक उपाययोजना होत्या.  याबद्दल त्यांनी अनेकांकडे संकल्पना मांडल्या. मात्र त्यांच्या जाण्याने या सर्व बाबी राहून गेल्याची हुरहूर भक्तगणांमध्ये आहे. भैय्यूजी महाराजांच्या अकाली निधनाने  जिल्हाभरातील शिष्यगणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबाचे अविभाज्य घटक होतेराष्ट्रसंत भैय्यूजी महाराज माझ्या कुटुंबाचे अविभाज्य घटक होते, ते आता आपल्यात नाहीत. मला आणि त्यांच्या असंख्य अनुयायींना हा फार मोठा धक्का आहे. मला ते नेहमी 'अक्का साहेब' म्हणून संबोधायचे. या अशा घटना मनाला फार वेदना देऊन जातात.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

दिशादर्शक हरपलाअध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी अध्यात्म तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या जाण्याने समाज मनाला दिशा देणारा दिशादर्शक हरपला.- आ. विनायक मेटे

धक्कादायक आहेअध्यात्मिक गुरू, भैय्यूजी महाराज यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात कधीही भरुन येणार नाही इतकी हानी झाली आहे. आत्महत्या केलेल्या असंख्य कुटुंबांना ज्यांनी आधार दिला. बीड जिल्ह्यात त्यांनी जलसिंचन,भूमिसुधार अभियान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ईश्वर चरणी प्रार्थना.- आ. जयदत्त क्षीरसागर

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याAmbajogaiअंबाजोगाई