शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भैय्यू महाराजांचे अंबाजोगाईशी होते भावनिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:29 IST

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते.

ठळक मुद्देइथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे  अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते. इतकेच नाही तर इथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते. अंबाजोगाईकरांशी त्यांच्या जुळलेल्या नात्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता धडकताच अंबाजोगाईकरही सुन्न झाले. त्यांच्या सहवासातील अनेक अठवणींना उजाळा मिळाला.

अंबाजोगाई हे प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे. अंबाजोगाईच्या परिसरात डोंगरदऱ्यात व जंगलात शिवालयांची व मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आद्यकवी मुकुंदराज, संत सर्वज्ञ दासोपंत यांचा अध्यात्मिक वारसा शहराची महती जगभर प्रसिद्ध करतो. आजतगायत अनेक त्यागी महापुरूषांना अंबाजोगाईत ज्ञानप्राप्त झाल्याचे सांगितले जाते.आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांचाही अंबाजोगाईशी संपर्क आला व त्यांचे अंबाजोगाईकरांशी भावनिक नाते जुळले. १९९९ ते  २००० या कालवधीत भैय्यूजी महाराज यांनी अंबाजोगाई परिसरातील डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या रेवलनाथ, नागनाथ, बुट्टेनाथ या शिवालयांमध्ये अनेकवेळा अनुष्ठान केले.

आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी संत सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहरातील काशीविश्वनाथ मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सकलेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांना ते सातत्याने भेटी देत असत. भय्यूजी महाराज हे स्वत: शिवभक्त असल्याने अंबाजोगाई परिसरातील विविध शिवालयांशी त्यांचे धार्मिक नाते जुळले होते. या मंदिरांविषयी त्यांना कमालीची ओढ होती. अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात वनस्पती औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पती उपयोगात आणण्यासाठी या भागात आयुर्वेद रूग्णालय स्थापन करण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांची ही इच्छा अधुरीच राहिली.

भैय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाई येथील भक्त अर्जुन वाघमारे व रोहित देशमुख हे त्यांच्यासोबत अंबाजोगाई व परिसरात सावलीसारखे फिरत.  अंबाजोगाईचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी भैय्यूजी महाराजांच्या मनात अनेक उपाययोजना होत्या.  याबद्दल त्यांनी अनेकांकडे संकल्पना मांडल्या. मात्र त्यांच्या जाण्याने या सर्व बाबी राहून गेल्याची हुरहूर भक्तगणांमध्ये आहे. भैय्यूजी महाराजांच्या अकाली निधनाने  जिल्हाभरातील शिष्यगणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबाचे अविभाज्य घटक होतेराष्ट्रसंत भैय्यूजी महाराज माझ्या कुटुंबाचे अविभाज्य घटक होते, ते आता आपल्यात नाहीत. मला आणि त्यांच्या असंख्य अनुयायींना हा फार मोठा धक्का आहे. मला ते नेहमी 'अक्का साहेब' म्हणून संबोधायचे. या अशा घटना मनाला फार वेदना देऊन जातात.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

दिशादर्शक हरपलाअध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी अध्यात्म तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या जाण्याने समाज मनाला दिशा देणारा दिशादर्शक हरपला.- आ. विनायक मेटे

धक्कादायक आहेअध्यात्मिक गुरू, भैय्यूजी महाराज यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात कधीही भरुन येणार नाही इतकी हानी झाली आहे. आत्महत्या केलेल्या असंख्य कुटुंबांना ज्यांनी आधार दिला. बीड जिल्ह्यात त्यांनी जलसिंचन,भूमिसुधार अभियान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ईश्वर चरणी प्रार्थना.- आ. जयदत्त क्षीरसागर

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याAmbajogaiअंबाजोगाई