शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भैय्यू महाराजांचे अंबाजोगाईशी होते भावनिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:29 IST

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते.

ठळक मुद्देइथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे  अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते. इतकेच नाही तर इथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते. अंबाजोगाईकरांशी त्यांच्या जुळलेल्या नात्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता धडकताच अंबाजोगाईकरही सुन्न झाले. त्यांच्या सहवासातील अनेक अठवणींना उजाळा मिळाला.

अंबाजोगाई हे प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे. अंबाजोगाईच्या परिसरात डोंगरदऱ्यात व जंगलात शिवालयांची व मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आद्यकवी मुकुंदराज, संत सर्वज्ञ दासोपंत यांचा अध्यात्मिक वारसा शहराची महती जगभर प्रसिद्ध करतो. आजतगायत अनेक त्यागी महापुरूषांना अंबाजोगाईत ज्ञानप्राप्त झाल्याचे सांगितले जाते.आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांचाही अंबाजोगाईशी संपर्क आला व त्यांचे अंबाजोगाईकरांशी भावनिक नाते जुळले. १९९९ ते  २००० या कालवधीत भैय्यूजी महाराज यांनी अंबाजोगाई परिसरातील डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या रेवलनाथ, नागनाथ, बुट्टेनाथ या शिवालयांमध्ये अनेकवेळा अनुष्ठान केले.

आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी संत सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहरातील काशीविश्वनाथ मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सकलेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांना ते सातत्याने भेटी देत असत. भय्यूजी महाराज हे स्वत: शिवभक्त असल्याने अंबाजोगाई परिसरातील विविध शिवालयांशी त्यांचे धार्मिक नाते जुळले होते. या मंदिरांविषयी त्यांना कमालीची ओढ होती. अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात वनस्पती औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पती उपयोगात आणण्यासाठी या भागात आयुर्वेद रूग्णालय स्थापन करण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांची ही इच्छा अधुरीच राहिली.

भैय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाई येथील भक्त अर्जुन वाघमारे व रोहित देशमुख हे त्यांच्यासोबत अंबाजोगाई व परिसरात सावलीसारखे फिरत.  अंबाजोगाईचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी भैय्यूजी महाराजांच्या मनात अनेक उपाययोजना होत्या.  याबद्दल त्यांनी अनेकांकडे संकल्पना मांडल्या. मात्र त्यांच्या जाण्याने या सर्व बाबी राहून गेल्याची हुरहूर भक्तगणांमध्ये आहे. भैय्यूजी महाराजांच्या अकाली निधनाने  जिल्हाभरातील शिष्यगणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबाचे अविभाज्य घटक होतेराष्ट्रसंत भैय्यूजी महाराज माझ्या कुटुंबाचे अविभाज्य घटक होते, ते आता आपल्यात नाहीत. मला आणि त्यांच्या असंख्य अनुयायींना हा फार मोठा धक्का आहे. मला ते नेहमी 'अक्का साहेब' म्हणून संबोधायचे. या अशा घटना मनाला फार वेदना देऊन जातात.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

दिशादर्शक हरपलाअध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी अध्यात्म तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या जाण्याने समाज मनाला दिशा देणारा दिशादर्शक हरपला.- आ. विनायक मेटे

धक्कादायक आहेअध्यात्मिक गुरू, भैय्यूजी महाराज यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात कधीही भरुन येणार नाही इतकी हानी झाली आहे. आत्महत्या केलेल्या असंख्य कुटुंबांना ज्यांनी आधार दिला. बीड जिल्ह्यात त्यांनी जलसिंचन,भूमिसुधार अभियान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ईश्वर चरणी प्रार्थना.- आ. जयदत्त क्षीरसागर

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याAmbajogaiअंबाजोगाई