शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:53 IST

गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विजयासाठी वज्रमुठ आवळा, गावाकडे जा, धनुष्यबाण घराघरामध्ये पोहचेल असे काम करा, सोंगाढोंगाची लोक गावाकडे येतील, गळ्यात हात घालून मतदान मागतील आणि याच हाताने कधी गळा दाबतील ते सांगता येत नाही, याची काळजी घ्या, गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.राजुरी आणि कामखेडा या दोन पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक वंजारवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला साक्षाळपिंप्री, बहाद्दरपूर, रूद्रापूर, अव्वलपूर, केतुरा, सोनगाव, पारगाव, शहाजानपूर, बहीरवाडी, बेलूरा, उमरद जहॉगीर, तांदळवाडी, रोहिलिंबा, लिंबारूई, मुर्शदपूर, राजुरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी येथील शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आजच्या या बैठकीला दोन पंचायत समिती गणातून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही उपस्थिती विजय निश्चित करणारी आहे. वज्रमुठ आवळून कामाला लागायचं आहे. आता सर्वजण गावाकडे जात आहात. धनुष्यबाण घराघरात पोहच झाला पाहिजे. सोंगाढोंगाची लोक गावात येतील. कुणी जातीवर तर कुणी गळ्यात हात घालून मतदान मागतील. अशा ढोंगी मंडळींच्या भूलथापांना थारा देऊ नका. सगळ्यांनी मनातून मदत केली तर आपला विजयाचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. यावेळी दिलीप गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला जगदीश काळे, वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नितीन धांडे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलास जगताप आणि निलेश जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार क्षीरसागरांनी केला.सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडून आणण्याची सामान्य लोकांची स्पर्धा सुरू आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. मतभेद बाजूला ठेवा, मी कधी कोणाची जात किंवा गट याचा विचार केला नाही. आपलेपण जपण्याची हीच खरी संधी आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवून घेण्यासाठी आणखी एका प्रयत्नाची गरज आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण