शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:53 IST

गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विजयासाठी वज्रमुठ आवळा, गावाकडे जा, धनुष्यबाण घराघरामध्ये पोहचेल असे काम करा, सोंगाढोंगाची लोक गावाकडे येतील, गळ्यात हात घालून मतदान मागतील आणि याच हाताने कधी गळा दाबतील ते सांगता येत नाही, याची काळजी घ्या, गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.राजुरी आणि कामखेडा या दोन पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक वंजारवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला साक्षाळपिंप्री, बहाद्दरपूर, रूद्रापूर, अव्वलपूर, केतुरा, सोनगाव, पारगाव, शहाजानपूर, बहीरवाडी, बेलूरा, उमरद जहॉगीर, तांदळवाडी, रोहिलिंबा, लिंबारूई, मुर्शदपूर, राजुरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी येथील शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आजच्या या बैठकीला दोन पंचायत समिती गणातून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही उपस्थिती विजय निश्चित करणारी आहे. वज्रमुठ आवळून कामाला लागायचं आहे. आता सर्वजण गावाकडे जात आहात. धनुष्यबाण घराघरात पोहच झाला पाहिजे. सोंगाढोंगाची लोक गावात येतील. कुणी जातीवर तर कुणी गळ्यात हात घालून मतदान मागतील. अशा ढोंगी मंडळींच्या भूलथापांना थारा देऊ नका. सगळ्यांनी मनातून मदत केली तर आपला विजयाचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. यावेळी दिलीप गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला जगदीश काळे, वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नितीन धांडे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलास जगताप आणि निलेश जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार क्षीरसागरांनी केला.सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडून आणण्याची सामान्य लोकांची स्पर्धा सुरू आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. मतभेद बाजूला ठेवा, मी कधी कोणाची जात किंवा गट याचा विचार केला नाही. आपलेपण जपण्याची हीच खरी संधी आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवून घेण्यासाठी आणखी एका प्रयत्नाची गरज आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण