शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

वाढलेली थंडी रबी पिकांसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

खरीप हंगामातील पिके काढणीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली होती. परंतु, रबी हंगाम हा सध्यातरी शेतकऱ्यांसाठी ...

खरीप हंगामातील पिके काढणीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली होती. परंतु, रबी हंगाम हा सध्यातरी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा दिसत आहे. गेल्या एक - दीड महिन्यांपूर्वी सतत ढगाळ वातावरण असल्याने रबी हंगामातील पिकांवर काही प्रमाणात चिकटा, लष्करी अळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला असून थंडी कमालीची वाढली आहे. त्याचबरोबर आकाश निरभ्र राहत असून ऊनही पडत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला असून पिके चांगल्या स्थितीत आहेत. वाढलेली थंडी ही गहू, हरभरा, कांदा आणि इतर पिकांसाठी लाभदायक ठरत आहे. यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी ४६ हजार ८७ हेक्टर, गहू ६ हजार ४३० हे. हरभरा १६ हजार १९७ तर कांदा पिकाची २ हजार ७५० हेक्टवर लागवड केली आहे. सध्या रबी हंगामातील पिकांसाठी लाभदायक वातावरण असल्याने शेतकरी आनंदी आहे.

रबी हंगामातील पीक पेरा

आष्टी ९ हजार ९२५, टाकळसिंग ८ हजार ६००, कडा ११ हजार ७१, धानोरा ९ हजार १२८, पिंपळा ९ हजार ४१, दौलावडगाव ८ हजार ९९१, धामणगाव १२ हजार १०० अशा एकूण ८६ हजार ८५६ हेक्टरवर रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली. तालुक्यात रबी/ उन्हाळा कांद्याची २ हजार ७८५ हेक्टवर लागवड केली आहे.

रबी पिकांसाठी वातावरण चांगले

वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. त्याचबरोबर दिवसभर चांगले ऊन पडत आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण हे सर्वच पिकांना चांगले आहे. असेच वातावरण पिकांची काढणी होईपर्यंत राहिले पाहिजे. गेल्या हंगामात अतिपावसामुळे वाया गेलेल्या पिकांची काही प्रमाणात भरपाई होईल.

राम नागरगोजे, शेतकरी