शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बीडच्या खाजगी डॉक्टरांचे ‘दातृत्व’ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:23 IST

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.

ठळक मुद्देसुरक्षित मातृत्व अभियान : १०२ डॉक्टरांकडून ६० हजार गरोदर मातांची तपासणी

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आरोग्य विभागाने सुरू केले. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे अभियान हाती घेण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याने गर्भवती मातांची उपचाराअभावी परवड होत होती. दुरवरून त्यांना जिल्हा रूग्णालय गाठावे लागत असे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना आवाहन करीत स्पवयंसेवक म्हणून सेवा देण्याची विनंती केली. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला.शासकीय रुग्णालयातील प्रसुतीत बीड तिसऱ्या क्रमांकावर४पूर्वी शासकीय रूग्णालयात प्रसुती करण्यास महिला पुढे येत नव्हत्या. परंतु या अभियानामुळे महिलांमध्ये जनजागृतीबरोबरच योग्य उपचार होत आहेत. त्यामुळे महिला शासकीय रूग्णालयात जावून प्रसुती करून घेतात.४पूर्वी हे प्रमाण जवळपास ५० टक्यापर्यंत होते. आता ते ८४ टक्यांवर पोहचले आहे. नंदुरबार, गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांनतर बीडचा तिसरा क्रमांक लागतो.जिल्ह्यात ७० ठिकाणी डॉक्टर करतात तपासणी४राज्यात एकूण ६९९ खाजगी डॉक्टरांपैकी एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल १०२ डॉक्टर हे कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हे डॉक्टर नियुक्त केलेल्या ७० ठिकाणी जावून गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी व इतर उपचार करतात.४११ महिन्यात ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी केली असून पैकी १०७२ माता अति जोखमीच्या असल्याचे समोर आले आहे. अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.माता मृत्यू रोखण्यात यश; दर शून्यावर नेण्यासाठी प्रयत्न२०१६-१७ मध्ये २३ मातांचा मृत्यू झाला. २०१७-१८ मध्ये ते १२ वर आले. सध्या मागील सहा महिन्यात केवळ तीन मातांचा मृत्यू झाला आहे. यावरून माता मृत्यू दर कमी करण्यातही आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसते. मृत्यू दर शुन्यावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.....अभियान यशस्वी करण्यासाठी १०२ खाजगी डॉक्टरांकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे. सर्वसामान्यांना तत्पर, तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याला यश मिळत आहे. खाजगी डॉक्टर, जिल्हा रूग्णालय टिम, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची टिम यासाठी परिश्रम घेत आहेत. यामुळेच हे शक्य होत आहे.- डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल