शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार

By सोमनाथ खताळ | Updated: May 9, 2024 19:46 IST

तुमचे पहिले मतदान कोणाला? २००४ मध्ये सर्वाधिक साडेचार लाख मतदार वाढले

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत ७७ वर्षांत म्हणजेच १९५२ पासून २०१९ पर्यंत एका पोटनिवडणुकीसह १८ लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता २०२४ ची १९ लोकसभा निवडणूक हाेत आहे. आतापर्यंत दोनवेळा मतदार संख्या कमी झाल्याचेही उघड झाले आहे. सर्वाधिक ४ लाख ६८ हजार मतदार हे २००४ मध्ये वाढले आहेत. यावेळी जयसिंगराव गायकवाडांनी पक्ष बदलल्यानंतरही त्यांची खासदारकीची हॅटट्रिक झाली होती. दरम्यान, वाढलेल्या नवमतदारांमध्येच खासदार बदलण्याची ताकद असल्याचे दिसून आले आहे. तसेच मतदारांनीही आपण पहिले मतदान कोणाला केले? याची आठवण यानिमित्ताने होत आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांचे वारे आता गतीने वाहू लागले आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे. या सर्वच उमेदवारांना जुन्यांसोबतच नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कारण विजय, पराजय हा या नवमतदारांवरच अवलंबून असणार आहे.

दोन वेळा कमी झाले मतदार१८ निवडणुकांपैकी पैकी १६ वेळा मतदान वाढले आहे. सुरुवातीला १९५२ च्या मतदानापेक्षाही १९५७ मध्ये मतदारांची संख्या २१५० ने घटली होती. त्यानंतर १९९१ मध्ये मतदार संख्या १६ हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. १९५७ ला रखमाजी धोंडीबा खासदार झाले, तर १९९१ मध्ये केशरकाकू क्षीरसागर निवडून आल्या होत्या. त्याअगोदरही क्षीरसागर या दोनवेळा निवडणूक जिंकल्या होत्या.

जनजागृतीचा झाला फायदामतदानप्रक्रियेतून खासदारांसह इतर लोकप्रतिनिधी निवडले जातात. ज्यांना १८ वर्षे पूर्ण आहेत, अशांनी मतदार यादीत नाव लावावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जाते. तसेच महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीही केली जाते. शिक्षण, महसूल व इतर विभागांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून नवमतदार नोंदणी केली जाते. यामुळेच मतदार संख्या वाढत आहे.

२०१९ मध्ये अडीच हजार ‘नोटा’ मतदान २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ३६ उमेदवार हे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे या दीड लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झाल्या; परंतु याच निवडणुकीत तब्बल अडीच हजार मतदारांनी ३६ पैकी एकालाही पसंती न देता ‘नोटा’ मतदान केले होते. हा पर्याय मागील काही निवडणुकांपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्याची गरजइतर निवडणुकांप्रमाणे लाेकसभा निवडणुकांच्या मतदानाचाही टक्का वाढण्याची नितांत गरज आहे. २०१९ मध्ये २० लाख मतदारांपैकी १३ लाख ५२ हजार मतदारांनीच हक्क बजावला होता. उर्वरित मतदारांनी मतदान करण्यास अनुत्सुकता दर्शविली; परंतु प्रशासनाने हा टक्का वाढविण्यासाठी आणि मतदानापासून दूर असणाऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वर्षे - मतदान - वाढलेले मतदार २०२४ - २११५८१३ - ७०४०८ २०१९ - २०४५४०५ - २०७४१८ २०१४ पोटनिवडणूक - १८३७९८७ - ४५३३५ २०१४ - १७९२६५२ - १५५४१३ २००९ - १६३७२३९ - ३१७३४८ २००४ - १३१९८९१ - ४६८३०० १९९९ - ८५१५९१ - १८६०९७ १९९८ - ६६५४९४ - ६४०८ १९९६ - ६५९०८६ - ४९३७२ १९९१ - ६०९७१४ - १६०२४ (कमी झाले) १९८९ - ६२५७३८ - १५२५४२ १९८४ - ४७३१९६ - ९०२३७ १९८० - ३८२९५९ - २८२९९ १९७७ - ३५४६६० - ७४८४२ १९७१ - २७९८१८ - २२०२ १९६७ - २७७६१६ - ९७०३४ १९६२ - १८०५८२ - ५६४७९ १९५७ - १२४१०३ - २१५० (कमी झाले) १९५२ - १२६२५३ - ००००मतदान वाढले १९८९५६०

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४