शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये विद्यार्थ्यांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:02 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या शेकडो तरूण बुधवारी विविध मागण्यांसाठी बीडमध्ये रस्त्यावर उतरले. कोणाचेही नेतृत्व नसलेला आणि संतापाची लाट घेऊन विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अंगात सळसळते रक्त असले तरी हातुन कसलीही चुक न होऊ देता, शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या शेकडो तरूण बुधवारी विविध मागण्यांसाठी बीडमध्ये रस्त्यावर उतरले. कोणाचेही नेतृत्व नसलेला आणि संतापाची लाट घेऊन विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अंगात सळसळते रक्त असले तरी हातुन कसलीही चुक न होऊ देता, शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, बीडच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी नऊ वाजेपासूनच सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात विद्यार्थी जमा होण्यास सुरूवात झाली. येथे मोर्चाचे नियोजन झाले. प्रत्येकाला नियमांचे पालन करून शिस्त पाळण्यासंदर्भात आवाहन केले. या मोर्चाचे नेतृत्व कोणीही करत नसून आपण सर्वच या नेतृत्व करणारे आहोत, असे सांगण्यात आले.

येथे अनेक विद्यार्थ्यांनी सरकारबद्दल आपला रोष व्यक्त केला. आपल्या मागण्यांबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर आकरा वाजता मोर्चाला सुरूवात झाली. अतिशय शिस्त आणि शांततेत मोर्चा निघाला. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. येथे शांततेचे आवाहन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानंतर राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बीड शहर व शिवाजीनगर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.‘चमकोगिरी’साठी पदाधिका-यांची धडपडजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर काही राजकीय व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांनी येथे हजेरी लावली. विद्यार्थ्यांच्या पुढे पुढे करीत ‘चमकोगिरी’ करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. एरव्ही झोपेत असलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणा-यांना या चमकोगिरी करणाºयांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या आहेत प्रमुख मागण्याराज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी

संयूक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओ ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागा भराव्यात ४पोलीस भरतीच्या पद संख्येत वाढ करावी 

सर्व परीक्षेस प्रवेश बायोमेट्रीक पद्धतीने द्यावा ४राज्य व जिल्हा पातळीवर रिक्त जागा भराव्यात

एमपीएससीने परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवा, तामिळनाडू पॅटर्न वापरावा

राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी जाहिर करावी

अभियोग्यता चाचणीनुसार शिक्षक भरती निवड प्रक्रिया तात्काळ करावी.

मुलींचा सहभाग लक्षणीयविद्यार्थ्यांच्या मोर्चात मुलींचा सहभाग लक्षणिय असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच त्यांनी मुलांच्या बरोबरीने सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात गर्दी केली होती. तसेच मुलांच्या बरोबरीने घोषणाबाजीही केली. निवेदन देण्यासाठी मुलांसोबत मुलींही आघाडीवर होत्या.

हातात फलक घेऊन घोषणाबाजीमोर्चात सहभागी विद्यार्थ्यांच्या हाती वेगवेगळ्या मागण्या असलेले फलक होते. तसेच हक्काच्या मागण्यांसाठी त्यांनी प्रशासन आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शहर दणाणून गेले. मागील अनेक वर्षांत सुशिक्षित बेरोजगारांचा आणि कोणाचेही नेतृत्व नसलेला हा मोर्चा पहिल्यांदाच निघाला.