शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

बीड नगर परिषदेचा २८६ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:59 IST

कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

शहरातील समस्या ‘आ’ वासून नागरिकांपुढे उभ्या आहेत. सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा, परिसरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते व शहरातील रसत्यांवरील खड्डे, विद्युत पुरवठा, शाळा, सिग्नलची व शहरातील उद्यानांची झालेली दुरवस्था व इतर अनेक मूलभूत गरजा आहेत. यासाठी भरीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचेही डॉ.क्षीरगसार म्हणाले.

मागच्या वर्षी नगरपालिकेकडून ८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. या तुलनेत यावर्षीचा अर्थसंकल्पाची रक्कम १९७ कोटी रूपयांनी जास्त म्हणजे २८६ कोटी इतकी आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटार योजना, शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण, पथदिवे तसेच कचरा व्यवस्थापन या पायाभूत योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात असल्याचेही डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोणतीही करवाढ नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहराचा गाडा हाकण्यासाठी कर भरण्याचे आवाहन न.प.कडून करण्यात आले आहे. बांधकाम परवानगीसाठी आॅनलाईन सुविधा केल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. याचबरोबर शहरातील नवीन ४० हजार स्थावर संपत्तींची नोंद नगरपालिकेकडे नव्हती ती करण्यात आल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचेही क्षीसागर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इतर मुद्यांवरही चर्चा केली.

यावेळी सभापती मुखीद लाला, विकास जोगदंड, गटनेते सादेक उज्जमा, विनोद मुळूक, भीमराव वाघचौरे, नरसिंग नाईकवाडे, गुरखुदे, गणेश वाघमारे, विनित काळे आदी उपस्थित होते.दरम्यान, यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील सर्व योजना मंजुर होतील व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासनही शेवटी डॉ.क्षीरसागर यांनी दिले.

नगरापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष हे शहर विकासाच्या विरोधात आहे, त्यांच्याकडून वैयक्तिक विरोधासाठी शहराच्या विकास कामांमध्ये अडवणूक करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला लोकशाही मूल्य काय असतात, हे माहिती नाही. विकास कामांमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही.यापूर्वी देखील नगरपालिकेमध्ये शिवसेना - भाजप हे विरोधीपक्ष होते, मात्र त्यांनी विकास कामाला कधी विरोध केला नाही. विकासाच्या बाजूने कोण आहे, हे जनतेला माहिती आहे, असे सांगून त्यांनी विविध मुद्यांवरून काकू-नाना आघाडीवर अप्रत्यक्ष आरोप डॉ. क्षीरसागर यांनी केला.

पाणीपुरवठाशहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमीत करण्यासाठी अमृत अभियान योजनेंतर्गंत ११४ कोटींची तरतूद आहे.उद्यानेखासबाग, यशंवत उद्यान, धांडे नगर, मोमीनपूरा व इतर ठिकाणच्या उद्यान निर्मीतीसाठी २.९४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

भुयारी गटार योजनायावर्षी पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेसाठी १६५.८० कोटी तर दुसºया टप्प्यातील योजनेसाठी ८३.१४ इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नगरापालिकेचा वाटा २५ टक्के असणार आहे.

विद्युत विभागशहरात १६०० विद्युत खांब व गरजेनूसार रोहित्र उभारण्यात येणार आहेत. शहरात एलईडी पथदिवे बसवण्यात येणार आहेत.

स्वच्छता विभागशहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या धरतीवर प्रत्येक प्रभागात हे राबवण्यात येणार आहे. याद्वारे विजेत्या प्रभागाला अनुक्रमे १०, ५ आणि ३ लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. भाजीमंडई आणि प्रमुख चौकांमध्ये ५० मीटर अंतरावर डस्टबीन ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील मलेरिया विभागासाठी धूर फवारणीकरिता नवीन माऊंटेड मशीन खरेदी करण्यात आली असून, याद्वारे धूर फवारणी करण्यात येणार आहे.

पालिकेतील राजकारणामुळे विकासाला खिळपालिकेची निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत बीड पालिकेत राजकारण सुरू आहे. काका-पुतण्याचा वाद बीड शहरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. तसेच इतर पक्षांनीही या काका-पुतण्यावर कडाडून टिका केली होती. या दोघांच्या राजकारणामुळेच शहराच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोपही केला जात होता, परंतु ते खोडून काढण्याचे आव्हान आता नगराध्यक्षांपुढे असणार आहे.