शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बीडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यासह चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:36 IST

बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.

ठळक मुद्देतीन वेगवेगळे अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.

मूळचे रायमोह येथील रहिवासी व पाटोदा येथे स्थायिक असलेले माजी जि. प. सदस्य नारायणराव क्षीरसागर हे बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधव याच्यासह पाटोद्याला येत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळाला पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कैलास जाधव जागीच ठार झाले तर नारायणराव क्षीरसागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून बीडला पाठवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

हापशावाले नारायणसेठकार अपघातात ठार झालेले नारायणराव क्षीरसागर यांनी पाटोदा व रायमोहा येथून दोन वेळा जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या काळात पाणीटंचाई निवारण कामावर त्यांचा विशेष भर होता. तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी हातपंपाचे जाळे निर्माण केले. आज तालुक्याची तहान याच पाण्यावर भागवली जाते . त्यांना हापशावाले नारायणसेठ म्हणून सर्वत्र ओळखले जात असे.
आष्टीचा तरु ण ठारबुधवारी रात्री आष्टी येथील सतीश मच्छिंद्र टेकाडे हा तरुण दुचाकीवरून पाटोद्याकडे येत असताना चुंबळी फाट्याजवळ त्याच्या गाडीस कोल्हा आडवा आला. कोल्ह्यास धडक दिल्याने सतीश तोल जाऊन पडला व त्याच्या डोक्यास मार लागला. पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून नगरकडे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. आष्टी येथील डॉ.राहुल टेकाडे यांचा सतीश हा चुलतभाऊ आहे.

जीपची दुचाकीस धडकमाजलगावहून गोविंद वैजीनाथ कदम व युवराज बंडू राऊत (२२) (रा. पाटील गल्ली, माजलगाव) हे दोघे गेवराईकडे दुचाकीवरुन (एम.एच.१६ ए.सी.७९५) जात होते. राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील केसापुरी कॅम्प येथे जीपने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यात युवराज राऊत हा जागीच ठार तर गोविंद कदम हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. दरम्यान, चालक जीपसह फरार आहे. माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.