शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

बीडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यासह चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:36 IST

बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.

ठळक मुद्देतीन वेगवेगळे अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.

मूळचे रायमोह येथील रहिवासी व पाटोदा येथे स्थायिक असलेले माजी जि. प. सदस्य नारायणराव क्षीरसागर हे बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधव याच्यासह पाटोद्याला येत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळाला पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कैलास जाधव जागीच ठार झाले तर नारायणराव क्षीरसागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून बीडला पाठवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

हापशावाले नारायणसेठकार अपघातात ठार झालेले नारायणराव क्षीरसागर यांनी पाटोदा व रायमोहा येथून दोन वेळा जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या काळात पाणीटंचाई निवारण कामावर त्यांचा विशेष भर होता. तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी हातपंपाचे जाळे निर्माण केले. आज तालुक्याची तहान याच पाण्यावर भागवली जाते . त्यांना हापशावाले नारायणसेठ म्हणून सर्वत्र ओळखले जात असे.
आष्टीचा तरु ण ठारबुधवारी रात्री आष्टी येथील सतीश मच्छिंद्र टेकाडे हा तरुण दुचाकीवरून पाटोद्याकडे येत असताना चुंबळी फाट्याजवळ त्याच्या गाडीस कोल्हा आडवा आला. कोल्ह्यास धडक दिल्याने सतीश तोल जाऊन पडला व त्याच्या डोक्यास मार लागला. पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून नगरकडे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. आष्टी येथील डॉ.राहुल टेकाडे यांचा सतीश हा चुलतभाऊ आहे.

जीपची दुचाकीस धडकमाजलगावहून गोविंद वैजीनाथ कदम व युवराज बंडू राऊत (२२) (रा. पाटील गल्ली, माजलगाव) हे दोघे गेवराईकडे दुचाकीवरुन (एम.एच.१६ ए.सी.७९५) जात होते. राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील केसापुरी कॅम्प येथे जीपने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यात युवराज राऊत हा जागीच ठार तर गोविंद कदम हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. दरम्यान, चालक जीपसह फरार आहे. माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.