लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.
मूळचे रायमोह येथील रहिवासी व पाटोदा येथे स्थायिक असलेले माजी जि. प. सदस्य नारायणराव क्षीरसागर हे बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधव याच्यासह पाटोद्याला येत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळाला पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कैलास जाधव जागीच ठार झाले तर नारायणराव क्षीरसागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून बीडला पाठवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
जीपची दुचाकीस धडकमाजलगावहून गोविंद वैजीनाथ कदम व युवराज बंडू राऊत (२२) (रा. पाटील गल्ली, माजलगाव) हे दोघे गेवराईकडे दुचाकीवरुन (एम.एच.१६ ए.सी.७९५) जात होते. राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील केसापुरी कॅम्प येथे जीपने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यात युवराज राऊत हा जागीच ठार तर गोविंद कदम हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. दरम्यान, चालक जीपसह फरार आहे. माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.