शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज - हर्ष पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:51 IST

येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषद : अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बीड : येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोद्दार म्हणाले, पोलीस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच सर्व ठाणे प्रमुख व विविध पथकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे. सर्व ठाणेप्रमुख व उप अधीक्षक आपल्या हद्दीत शांतता समितीची बैठक घेत आहेत.यामध्ये हिंदू-मुस्लिम धर्मातील प्रमुख तसेच तरुणांचा समावेश आहे. त्यांना या निकालाच्या पार्श्वभूमीवर माहिती देऊन पोलीस दलाची भूमिका समजावून सांगितली जात आहे. एखाद्या समाजकंटकाकडून पसरवलेल्या खोट्या अफवेमुळे काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अशा प्रकारच्या होणाºया अनुचित प्रकारात तरुणांना नाहक खेचले जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव देखील या बैठकीत करून दिली जात आहे. सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले.आपण चुकीचे नसल्यास घाबरण्याचे कारण नाहीजिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाकडून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात विविध चौकांमध्ये ‘मॉक ड्रिल’ केले जाणार आहे.त्यावेळी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने आहेत. त्यामुळे चुकीचे नसल्यावर नागरिकांनी घाबरू नये पोलीस सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत.सायबर सेलचे लक्षसोशल मीडियाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये पसरवल्या जाणाºयांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच अशा वादग्रस्त व खोट्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवणे देखील गुन्हा आहे. त्यावर देखील सायबर सेलकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रसार करणाºयांवर देखील पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.जमावबंदी आदेश लागूजिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बळ वाढवले आहे. सर्व ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. या कालावधीत फटाके फोडणे, गर्दी करणे, विटा, दगड अवैध हत्यारे घेऊन फिरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना दिले आहेत. भारतीय संविधानानूसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम आहे. त्यामुळे आयोध्येतील जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी मान्य करावा. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडAyodhyaअयोध्या