शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज - हर्ष पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:51 IST

येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषद : अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बीड : येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोद्दार म्हणाले, पोलीस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच सर्व ठाणे प्रमुख व विविध पथकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे. सर्व ठाणेप्रमुख व उप अधीक्षक आपल्या हद्दीत शांतता समितीची बैठक घेत आहेत.यामध्ये हिंदू-मुस्लिम धर्मातील प्रमुख तसेच तरुणांचा समावेश आहे. त्यांना या निकालाच्या पार्श्वभूमीवर माहिती देऊन पोलीस दलाची भूमिका समजावून सांगितली जात आहे. एखाद्या समाजकंटकाकडून पसरवलेल्या खोट्या अफवेमुळे काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अशा प्रकारच्या होणाºया अनुचित प्रकारात तरुणांना नाहक खेचले जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव देखील या बैठकीत करून दिली जात आहे. सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले.आपण चुकीचे नसल्यास घाबरण्याचे कारण नाहीजिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाकडून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात विविध चौकांमध्ये ‘मॉक ड्रिल’ केले जाणार आहे.त्यावेळी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने आहेत. त्यामुळे चुकीचे नसल्यावर नागरिकांनी घाबरू नये पोलीस सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत.सायबर सेलचे लक्षसोशल मीडियाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये पसरवल्या जाणाºयांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच अशा वादग्रस्त व खोट्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवणे देखील गुन्हा आहे. त्यावर देखील सायबर सेलकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रसार करणाºयांवर देखील पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.जमावबंदी आदेश लागूजिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बळ वाढवले आहे. सर्व ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. या कालावधीत फटाके फोडणे, गर्दी करणे, विटा, दगड अवैध हत्यारे घेऊन फिरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना दिले आहेत. भारतीय संविधानानूसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम आहे. त्यामुळे आयोध्येतील जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी मान्य करावा. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडAyodhyaअयोध्या