शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

इंग्लंडमधून आलेले बीडचे दाम्पत्य मुंबईत क्वारंटाइन, रिपाेर्ट निगेटिव्ह, गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST

बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दाम्पत्य मागील दीड वर्षांपासून इंग्लमध्ये वास्तव्यास होते. परंतु कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य २२ डिसेंबरला ...

बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दाम्पत्य मागील दीड वर्षांपासून इंग्लमध्ये वास्तव्यास होते. परंतु कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य २२ डिसेंबरला भारतात आले आणि त्यांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेऊन क्वारंटाइन केले. सहाव्या दिवशी चाचणी केली असता आठव्या दिवशी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. आता हे दाम्पत्य मुंबईहून गावाच्या दिशेने रवाना झाले आहे. आता गावातही आल्यावर आपण क्वारंटाइन राहणार असल्याचे या दाम्पत्याने ‘लोकमत’ला सांगितले. आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील २९ वर्षीय पुरुष व्यक्ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. दोन वर्षांसाठी त्यांना इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. ते आपल्या २७ वर्षीय पत्नीसह दीड वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहतात. परंतु इकडे आईची तब्येत खराब झाल्याने ते भेटण्यासाठी गावी आले. त्यांना भारतातील नियमांची कल्पना नसल्याने ते तेथून निघाले आणि मुंबईत अडकले. २५ दिवसांच्या सुट्या घेऊन गावी आलेल्या या व्यक्तीचे ८ दिवस क्वारंटाइनमध्येच गेले.

नागरिक गाफील राहत असल्याचे वास्तव

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक गाफील राहत असून काळजी घेत नाहीत. परंतु अद्यापही धोका टळलेला नसून काळजी घ्यावी.

विदेशातून २०० पेक्षा जास्त लोक भारतात

जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आष्टी तालुक्यातील इटकूर येथे आढळला. तेव्हापासून जिल्ह्यात जवळपास २०० लोक विदेशातून आलेले आहेत. या सर्वांना संस्थात्मक व गृह अलगीकरण करून कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील जवळपास १० लोक कोरोनाबाधित आढळले होते. या सर्वांवर आरोग्य विभाग नजर ठेवून होता.

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?

मागील १८ दिवसांत विदेशातून किती लोक आले, याची माहिती संबंधित आरोग्य विभागाला विमानतळावरून देण्यात आली. बीडमधील लवूळ क्रमांक १ मधील दाम्पत्य आल्याचे समजले. परंतु त्यांना विमानतळावरच शोधून हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले. त्यांची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली असता मंगळवारी अहवाल निगेटिव्ह आला.

आरोग्य विभाग संपर्कात

मागील २८ दिवसांत विदेशातून जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघे मुंबईत क्वारंटाइन केले. त्यांच्या नियमित संपर्कात आहोत. दोघांचीही चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी १४ दिवस संपर्कात राहू.

- डॉ.आर.बी. पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड