शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

इंग्लंडमधून आलेले बीडचे दाम्पत्य मुंबईत क्वारंटाइन, रिपाेर्ट निगेटिव्ह, गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST

बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दाम्पत्य मागील दीड वर्षांपासून इंग्लमध्ये वास्तव्यास होते. परंतु कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य २२ डिसेंबरला ...

बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दाम्पत्य मागील दीड वर्षांपासून इंग्लमध्ये वास्तव्यास होते. परंतु कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य २२ डिसेंबरला भारतात आले आणि त्यांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेऊन क्वारंटाइन केले. सहाव्या दिवशी चाचणी केली असता आठव्या दिवशी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. आता हे दाम्पत्य मुंबईहून गावाच्या दिशेने रवाना झाले आहे. आता गावातही आल्यावर आपण क्वारंटाइन राहणार असल्याचे या दाम्पत्याने ‘लोकमत’ला सांगितले. आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील २९ वर्षीय पुरुष व्यक्ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. दोन वर्षांसाठी त्यांना इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. ते आपल्या २७ वर्षीय पत्नीसह दीड वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहतात. परंतु इकडे आईची तब्येत खराब झाल्याने ते भेटण्यासाठी गावी आले. त्यांना भारतातील नियमांची कल्पना नसल्याने ते तेथून निघाले आणि मुंबईत अडकले. २५ दिवसांच्या सुट्या घेऊन गावी आलेल्या या व्यक्तीचे ८ दिवस क्वारंटाइनमध्येच गेले.

नागरिक गाफील राहत असल्याचे वास्तव

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक गाफील राहत असून काळजी घेत नाहीत. परंतु अद्यापही धोका टळलेला नसून काळजी घ्यावी.

विदेशातून २०० पेक्षा जास्त लोक भारतात

जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आष्टी तालुक्यातील इटकूर येथे आढळला. तेव्हापासून जिल्ह्यात जवळपास २०० लोक विदेशातून आलेले आहेत. या सर्वांना संस्थात्मक व गृह अलगीकरण करून कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील जवळपास १० लोक कोरोनाबाधित आढळले होते. या सर्वांवर आरोग्य विभाग नजर ठेवून होता.

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?

मागील १८ दिवसांत विदेशातून किती लोक आले, याची माहिती संबंधित आरोग्य विभागाला विमानतळावरून देण्यात आली. बीडमधील लवूळ क्रमांक १ मधील दाम्पत्य आल्याचे समजले. परंतु त्यांना विमानतळावरच शोधून हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले. त्यांची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली असता मंगळवारी अहवाल निगेटिव्ह आला.

आरोग्य विभाग संपर्कात

मागील २८ दिवसांत विदेशातून जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघे मुंबईत क्वारंटाइन केले. त्यांच्या नियमित संपर्कात आहोत. दोघांचीही चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी १४ दिवस संपर्कात राहू.

- डॉ.आर.बी. पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड