शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली; प्रेरणा देशभ्रतार येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:51 IST

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभ्रतार या बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असणार आहेत. बुधवारी यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. अवघे ९ महिने ८ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध लोकोपयोगी निर्णय जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावणे, बँकांकडून शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी तसेच त्यांच्या अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना संबंधितांना दिल्या होत्या. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १ हजार टँकर व ६०० पेक्षा अधिक चारा छावण्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना आणि शेतक-यांसह पशुधनास दिलासा मिळाला.भ्रष्टाचार करणाºया छावणीचालकांवर राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली होती. यामुळे गैरप्रकारांना आळा बसून शासनाचे लाखो रुपये वाचले होते. मागील काही दिवसात ‘या आपले शहर घडवूया’ हा उपक्रमातून शहरातील स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली होती.स्वत: हातात झाडू घेऊन यंत्रणेसह सामाजिक संघटना, संस्थांना यात सहभागी करून घेतले होते. शहरातून वाहणाºया बिंदुसरा नदीच्या पात्राची स्वच्छता करून हे पात्र पर्यटनाचे स्थळ बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते.लोकसभा, विधानसभा निवडणुका नियोजनबद्धजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे बीड येथे रुजू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरु झाले होते.त्याचे योग्य नियोजन करुन शांततेत निवडणुका पार पाडल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील सर्व मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत पार पडली.अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस त्यांनी निर्बंध आणले. तसेच वाळू वाहतूक करणा-या सर्व गाड्या जीपीएससोबत संलग्न केल्या.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी आखली योजनाजिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांची संख्या आहे. या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३१ प्रश्नावलीची योजना आखली होती. तिचे काम तालुकास्तरावर सुरु आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीTransferबदली