शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली; प्रेरणा देशभ्रतार येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:51 IST

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभ्रतार या बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असणार आहेत. बुधवारी यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. अवघे ९ महिने ८ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध लोकोपयोगी निर्णय जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावणे, बँकांकडून शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी तसेच त्यांच्या अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना संबंधितांना दिल्या होत्या. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १ हजार टँकर व ६०० पेक्षा अधिक चारा छावण्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना आणि शेतक-यांसह पशुधनास दिलासा मिळाला.भ्रष्टाचार करणाºया छावणीचालकांवर राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली होती. यामुळे गैरप्रकारांना आळा बसून शासनाचे लाखो रुपये वाचले होते. मागील काही दिवसात ‘या आपले शहर घडवूया’ हा उपक्रमातून शहरातील स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली होती.स्वत: हातात झाडू घेऊन यंत्रणेसह सामाजिक संघटना, संस्थांना यात सहभागी करून घेतले होते. शहरातून वाहणाºया बिंदुसरा नदीच्या पात्राची स्वच्छता करून हे पात्र पर्यटनाचे स्थळ बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते.लोकसभा, विधानसभा निवडणुका नियोजनबद्धजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे बीड येथे रुजू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरु झाले होते.त्याचे योग्य नियोजन करुन शांततेत निवडणुका पार पाडल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील सर्व मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत पार पडली.अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस त्यांनी निर्बंध आणले. तसेच वाळू वाहतूक करणा-या सर्व गाड्या जीपीएससोबत संलग्न केल्या.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी आखली योजनाजिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांची संख्या आहे. या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३१ प्रश्नावलीची योजना आखली होती. तिचे काम तालुकास्तरावर सुरु आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीTransferबदली