शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

Beed: पिंपरी घाट येथे गाव जेवणातून २०६ जणांना विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:34 IST

३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात दुपारी गाव जेवण कार्यक्रमानंतर सुमारे २०६ जणांना विषबाधा झाली. यातील ३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर रुग्णांवर आरोग्य विभागाच्या टीमने गावातच उपचार केले.

पिंपरी येथे जागृत हनुमान देवस्थान आहे. इथे या मंदिरात भक्त गावजेवण देण्याची प्रथा पाळतात. बुधवारी दुपारी गावात गाव जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघात विभागातील सीएमओ मारुती आंबाड, सर्व परिचारिका, कर्मचारी यांच्यासह राहुल गित्ते यांनी तातडीने रुग्णांना दाखल करून घेत उपचार सुरू केले. आता त्या ३५ रुग्णांची प्रकृती स्थिर झाली आहे. तर विषबाधा झाल्याचे लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातच उपचार केले. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि योग्य त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

आरोग्य विभागाची टीम पिंपरीमध्ये तळ ठोकूनपिंपरी येथील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब लोमटे यांनी घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील आरोग्य व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना औषधी साठ्यासह गावात पाठविले. त्यांनी स्वतः याठिकाणी भेट देत रुग्णांवर गावातच उपचार केले. आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.

भातातून विषबाधा झाल्याचा निष्कर्षगाव जेवणासाठी जवळपास १ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वरण, भात, भाजी, पोळी, मठ्ठा, बुंदी असा जेवणाचा बेत होता. कडक ऊन व लवकर शिजवलेला भात व उशिरा झालेले जेवण यामुळे भातातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाBeedबीड