शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

Beed: पिंपरी घाट येथे गाव जेवणातून २०६ जणांना विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:34 IST

३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात दुपारी गाव जेवण कार्यक्रमानंतर सुमारे २०६ जणांना विषबाधा झाली. यातील ३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर रुग्णांवर आरोग्य विभागाच्या टीमने गावातच उपचार केले.

पिंपरी येथे जागृत हनुमान देवस्थान आहे. इथे या मंदिरात भक्त गावजेवण देण्याची प्रथा पाळतात. बुधवारी दुपारी गावात गाव जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघात विभागातील सीएमओ मारुती आंबाड, सर्व परिचारिका, कर्मचारी यांच्यासह राहुल गित्ते यांनी तातडीने रुग्णांना दाखल करून घेत उपचार सुरू केले. आता त्या ३५ रुग्णांची प्रकृती स्थिर झाली आहे. तर विषबाधा झाल्याचे लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातच उपचार केले. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि योग्य त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

आरोग्य विभागाची टीम पिंपरीमध्ये तळ ठोकूनपिंपरी येथील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब लोमटे यांनी घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील आरोग्य व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना औषधी साठ्यासह गावात पाठविले. त्यांनी स्वतः याठिकाणी भेट देत रुग्णांवर गावातच उपचार केले. आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.

भातातून विषबाधा झाल्याचा निष्कर्षगाव जेवणासाठी जवळपास १ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वरण, भात, भाजी, पोळी, मठ्ठा, बुंदी असा जेवणाचा बेत होता. कडक ऊन व लवकर शिजवलेला भात व उशिरा झालेले जेवण यामुळे भातातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाBeedबीड