शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बीडमध्ये ११२६९ शेतकरी पात्र तरीही शेततळ््यांचे उद्दिष्ट अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:21 IST

बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळ निवारणासाठी शेततळे : शेतक-यांनीही पाठपुरावा करावा

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळे जिल्ह्यात होणे आवश्यक होते. मात्र हे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. जिल्ह्यातील दुष्काळ निवारण व्हावे व शेतीला मुबलक पाणी मिळून रबी आणि खरीप हंगामातील दोन्ही पिके शेतक-यांना घेता यावीत, हा योजनेचा हेतू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

मात्र त्यापैकी फक्त ४१०५ शेतकरी या योजनेचे लाभार्थी झाले. तसेच ३५५ शेततळ््याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४४६० शेततळे झाल्याचे चित्र आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोण कमी पडले हा प्रश्न आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी ही योजना उपयोगी आहे. मात्र यासाठी प्रशासनाने आणि शेतक-यांनी योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शेततळ्याविषयी जनजागृती शासनाकडून केली जाते. तरी देखील जिल्ह्यात शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन प्रणाली वापरावी लागते. त्यामुळे याचा पाठपुरावा शेतकºयांनी वेळो-वेळी केला नाही तर त्यांचे नाव या योजनेमधून वगळण्यात येते हेही एक कारण या योजनेची उद्दिष्टपूर्ती न होण्याचे आहे.

शेतकरी प्रशासनात योजनेविषयी उदासीनतामागेल त्याला शेततळे योजनेबाबत पुरेशी व समर्पक माहिती देण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी, अधिकारी एकतर उपलब्ध होत नाहीत. तर भेट झाल्यास शेत-यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. कागदपत्रातील किरकोळ त्रुटी काढून प्रस्ताव नाकारले जातात. दलालामार्फत शेततळ्याचे काम तत्परतेने होते. शेतकºयांना गावातील सरपंच ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतक-यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तसेच शेततळे घेण्यासाठी शेतक-यांनी वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक.जिल्ह्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी व दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी जिल्ह्यात अशा योजना १०० टक्के राबवणे आवश्यक आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजना उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची बारमाही पाणी उपलब्धतेमुळे शेतीमध्ये नवे प्रयोग करता येतील