शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बीड गोदामातील अपहार ८१ लाखांपेक्षाही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गोदाम व्यवस्थापक दिलीप भडके याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, हा अपहार ८१ लाखांचा नसून याचा आकडा वाढल्याची नवीन माहिती समोर आली आहे.या प्रकरणाचा तपास करताना, पोलीसांना व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नेमका किती माल होता व किती मालाचा अपहार झाला याबबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र १ एप्रिल रोजी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकानेच तब्बल ६९ लाखांचा घोटाळा उघडकीस आणला होता. यावेळी देण्यात आलेल्या अहवालामध्ये रेशनच्या गव्हाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर मे २०१९ मध्ये तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्यात ६३ लाख रुपये किमतीच्या गव्हाचा देखील अपहार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अपहाराचा आकडा वाढणार असून हा अपहार १ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्याशिवाय नेमका किती अपहार झाला आहे याचे गुढ उकलणार आहे.यापुर्वी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. त्यानंतर देखील अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडून अपहार केलेल्या मालाच्या रखमेची वसूली देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ मे रोजी तहसीलदारांनी गोदामाच्या पंचनामा केला आणि त्यात इतके धान्य कमी असल्याचे समोर आल्यांनंतर तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गोदामाची पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने, जे गोदाम तपासणीतील तज्ञ आहेत त्यांनी १ एप्रिल रोजी तपासणी केली होती. यात गहू वगळता तांदूळ, साखर आणि डाळी असे तब्बल ६९ लाखाचे धान्य कमी आढळून आले होते. त्याची वसुली करण्याची शिफारस पथकाने केली होती, त्यानुसार गोदाम व्यवस्थापकासह तहसीलदार, नायब तहसीलदार यांना देखील नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या.तहसीलदारांनी बीड धान्य गोदाम ताब्यात घेतला होता व मे महिन्यात गोदाम तपासणी करुन पंचनामा केला होता. यावेळी ८१ लाखांचे धान्य कमी असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे यात तब्बल ६३ लाखांचा गहू कमी दाखविण्यात आला आहे. परंतु पथकाने केलेल्या तपासणीमध्ये व तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केलेल्या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येत आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गहू वगळता झालेला अपहार ६९ लाखांचा होता, तर मे महिन्यात ६३ लाखांचा गहू गोदामात नसताना देखील आकडा अहवालामध्ये केवळ ८१ लाखाचा आहे. यावरुन हा धान्याचा अपहार ८१ लाखाचा नसून त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारfoodअन्न