शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बीडमध्ये स्कूल रिक्षाचालकांचा आडमुठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:15 IST

क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले.

ठळक मुद्देकारवाईच्या भीतीने लहान मुलांना रस्त्यात सोडून पसार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले. नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाºया या रिक्षाचालकांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.

मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात शाळकरी मुलांची रिक्षांतून क्षमतेपेक्षा अधिक बसवून वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. असे असतानाही आरटीओ व शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी एक दिवस कारवाई करून वाहतूक शाखेने दंड वसूल केला होता.

त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती. मंगळवारी पुन्हा कारवाईची मोहिम हाती घेतली. एक-दोन रिक्षा पकडल्यानंतर सर्वांनी एकमेकांना फोनाफोनी करून कारवाईची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनीच मुलांना सोडून पळ काढला. यामुळे मुलांचे हाल झाले. पालकांनीच आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याबरोबरच जाऊन आणले. दरम्यान, नियमांचे पालन करणा-या रिक्षा चालकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

जे नियमांचे उल्लंघण करून मुलांची वाहतूक करतात, त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर योग्य असेही संघटनेने कळविले आहे. सर्व स्कूल रिक्षांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, अशी मागणी आहे.

  • रिक्षा संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा

मंगळवारी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर जिनियस स्कूल आॅटो युनियनतर्फे शाळेच्या रिक्षांचा बेमुदत संप पुकारल्याचे पत्रक काढले.जिल्हाधिका-यांना भेटून १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यामध्ये कळविले आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बाबूभाई आतार, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव अशोक शेटे यांनी केले आहे.