शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

बीडमध्ये स्कूल रिक्षाचालकांचा आडमुठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:15 IST

क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले.

ठळक मुद्देकारवाईच्या भीतीने लहान मुलांना रस्त्यात सोडून पसार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले. नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाºया या रिक्षाचालकांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.

मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात शाळकरी मुलांची रिक्षांतून क्षमतेपेक्षा अधिक बसवून वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. असे असतानाही आरटीओ व शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी एक दिवस कारवाई करून वाहतूक शाखेने दंड वसूल केला होता.

त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती. मंगळवारी पुन्हा कारवाईची मोहिम हाती घेतली. एक-दोन रिक्षा पकडल्यानंतर सर्वांनी एकमेकांना फोनाफोनी करून कारवाईची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनीच मुलांना सोडून पळ काढला. यामुळे मुलांचे हाल झाले. पालकांनीच आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याबरोबरच जाऊन आणले. दरम्यान, नियमांचे पालन करणा-या रिक्षा चालकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

जे नियमांचे उल्लंघण करून मुलांची वाहतूक करतात, त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर योग्य असेही संघटनेने कळविले आहे. सर्व स्कूल रिक्षांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, अशी मागणी आहे.

  • रिक्षा संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा

मंगळवारी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर जिनियस स्कूल आॅटो युनियनतर्फे शाळेच्या रिक्षांचा बेमुदत संप पुकारल्याचे पत्रक काढले.जिल्हाधिका-यांना भेटून १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यामध्ये कळविले आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बाबूभाई आतार, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव अशोक शेटे यांनी केले आहे.