शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बीडमध्ये कैद्यांच्या पलायनाला खुज्या भिंतीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:07 IST

बीड येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देउंची वाढविण्यासाठी कारागृहाचे सा.बां.ला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला ज्ञानेश्वर जाधव हा खिडकीच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चढला. तेथून तटभिंतीवर गेला व तेथून खाली उडी मारली. यात जखमी झाल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. सुदैवाने तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी तातडीने कारागृहास भेट देऊन जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

दरम्यान, आरोपींनी पलायन केल्यानंतर ‘लोकमत’ने कारागृहातील सुरक्षेसंदर्भात कारागृह अधीक्षक एम. एस. पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार, रिजर्व गार्ड व मुलाखत कक्ष यांच्यावरील भिंतीची उंची वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.

सध्या या भिंतीची उंची १३ ते १४ फूट असून, ती तटभिंतीएवढी म्हणजे २१ फूट करावी असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच मुख्य प्रवेशद्वार ते दुय्यम गेटवरील भिंतीची उंची वाढविण्यासंदर्भात त्यांनी सा. बां. ला कळविले आहे.सुरक्षेसाठी कर्मचारी अपुरेचार एकरात असलेल्या बीड कारागृहात ८ बराकी आहेत. याची एकूण क्षमता १६६ आहे. सद्य स्थितीत दुपटीने म्हणजे ३०२ बंदी आहेत. कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी १६६ बंद्यांच्या तुलनेत पाच अधिकारी व ४३ कर्मचारी एवढे मनुष्यबळ आहे. प्रत्यक्षात मात्र बंद्यांची संख्या दुपटीने वाढली असली तरी सुरक्षेसाठी बंदोबस्त मात्र तेवढाच आहे. अपु-या मनुष्यबळावर एवढे कैदी सांभाळणे कारागृह प्रशासनासाठी कसरतीचे ठरू पाहत आहे. त्यातच पाच अधिकाºयांपैकी कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत. ४३ पैकी २ कर्मचारी निलंबित झाल्याने ४१ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. कैद्यांची संख्या पाहता कारागृहात मनुष्यबळ वाढविण्याबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आठ वर्षांपूर्वी तिघांनी केले होते पलायन२००९ साली तटभिंतीचा दगड काढून तीन आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तातडीने मजबूत व उंच अशी तटभिंत बनविण्यात आली. सध्या या तटभिंतीची उंची २१ फूट आहे.