शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कैद्यांच्या पलायनाला खुज्या भिंतीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:07 IST

बीड येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देउंची वाढविण्यासाठी कारागृहाचे सा.बां.ला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला ज्ञानेश्वर जाधव हा खिडकीच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चढला. तेथून तटभिंतीवर गेला व तेथून खाली उडी मारली. यात जखमी झाल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. सुदैवाने तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी तातडीने कारागृहास भेट देऊन जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

दरम्यान, आरोपींनी पलायन केल्यानंतर ‘लोकमत’ने कारागृहातील सुरक्षेसंदर्भात कारागृह अधीक्षक एम. एस. पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार, रिजर्व गार्ड व मुलाखत कक्ष यांच्यावरील भिंतीची उंची वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.

सध्या या भिंतीची उंची १३ ते १४ फूट असून, ती तटभिंतीएवढी म्हणजे २१ फूट करावी असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच मुख्य प्रवेशद्वार ते दुय्यम गेटवरील भिंतीची उंची वाढविण्यासंदर्भात त्यांनी सा. बां. ला कळविले आहे.सुरक्षेसाठी कर्मचारी अपुरेचार एकरात असलेल्या बीड कारागृहात ८ बराकी आहेत. याची एकूण क्षमता १६६ आहे. सद्य स्थितीत दुपटीने म्हणजे ३०२ बंदी आहेत. कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी १६६ बंद्यांच्या तुलनेत पाच अधिकारी व ४३ कर्मचारी एवढे मनुष्यबळ आहे. प्रत्यक्षात मात्र बंद्यांची संख्या दुपटीने वाढली असली तरी सुरक्षेसाठी बंदोबस्त मात्र तेवढाच आहे. अपु-या मनुष्यबळावर एवढे कैदी सांभाळणे कारागृह प्रशासनासाठी कसरतीचे ठरू पाहत आहे. त्यातच पाच अधिकाºयांपैकी कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत. ४३ पैकी २ कर्मचारी निलंबित झाल्याने ४१ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. कैद्यांची संख्या पाहता कारागृहात मनुष्यबळ वाढविण्याबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आठ वर्षांपूर्वी तिघांनी केले होते पलायन२००९ साली तटभिंतीचा दगड काढून तीन आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तातडीने मजबूत व उंच अशी तटभिंत बनविण्यात आली. सध्या या तटभिंतीची उंची २१ फूट आहे.