शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

बीडमध्ये कैद्यांच्या पलायनाला खुज्या भिंतीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:07 IST

बीड येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देउंची वाढविण्यासाठी कारागृहाचे सा.बां.ला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला ज्ञानेश्वर जाधव हा खिडकीच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चढला. तेथून तटभिंतीवर गेला व तेथून खाली उडी मारली. यात जखमी झाल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. सुदैवाने तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी तातडीने कारागृहास भेट देऊन जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

दरम्यान, आरोपींनी पलायन केल्यानंतर ‘लोकमत’ने कारागृहातील सुरक्षेसंदर्भात कारागृह अधीक्षक एम. एस. पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार, रिजर्व गार्ड व मुलाखत कक्ष यांच्यावरील भिंतीची उंची वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.

सध्या या भिंतीची उंची १३ ते १४ फूट असून, ती तटभिंतीएवढी म्हणजे २१ फूट करावी असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच मुख्य प्रवेशद्वार ते दुय्यम गेटवरील भिंतीची उंची वाढविण्यासंदर्भात त्यांनी सा. बां. ला कळविले आहे.सुरक्षेसाठी कर्मचारी अपुरेचार एकरात असलेल्या बीड कारागृहात ८ बराकी आहेत. याची एकूण क्षमता १६६ आहे. सद्य स्थितीत दुपटीने म्हणजे ३०२ बंदी आहेत. कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी १६६ बंद्यांच्या तुलनेत पाच अधिकारी व ४३ कर्मचारी एवढे मनुष्यबळ आहे. प्रत्यक्षात मात्र बंद्यांची संख्या दुपटीने वाढली असली तरी सुरक्षेसाठी बंदोबस्त मात्र तेवढाच आहे. अपु-या मनुष्यबळावर एवढे कैदी सांभाळणे कारागृह प्रशासनासाठी कसरतीचे ठरू पाहत आहे. त्यातच पाच अधिकाºयांपैकी कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत. ४३ पैकी २ कर्मचारी निलंबित झाल्याने ४१ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. कैद्यांची संख्या पाहता कारागृहात मनुष्यबळ वाढविण्याबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आठ वर्षांपूर्वी तिघांनी केले होते पलायन२००९ साली तटभिंतीचा दगड काढून तीन आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तातडीने मजबूत व उंच अशी तटभिंत बनविण्यात आली. सध्या या तटभिंतीची उंची २१ फूट आहे.