शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचे आत्महत्यासत्र सुरूच; बीड जिल्ह्यात जानेवारीपासून ७५ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:52 IST

बीड जिल्ह्यात दर एका वर्षाआड दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

ठळक मुद्देशासन स्तरावरून योजनांच्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी४४ प्रकरणे पात्र, तर १४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. योजनेच्या लाभासाठी १७ प्रकरणे अपात्र ठरवले आहेत.

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. यावर्षी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ७५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्या सर्वांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासन स्तरावरून योजनांच्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

बीड जिल्ह्यात दर एका वर्षाआड दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र, नैर्सर्गिक संकटामुळे काही जण हार मानतात व आत्महत्येचा पर्याय निवडतात. परंतु, शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा अवलंब करत योग्य नियोजन करून जर शेती केली तर, परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यामुळे आत्महत्या रोखण्यास देखील यश येईल. यादृष्टीने शासन स्तरावरून कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ४४ प्रकरणे पात्र, तर १४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तसेच १७ प्रकरणे अपात्र ठरवले आहेत. यासंदर्भात प्रशासनाने बैठक घेऊन कुटुंबियांना लागू योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी. या वर्षभरात विविध पातळीवर देण्यात येणाऱ्या लाभाचे प्रमाणात अतिशय कमी आसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

योजनांचा लाभ देण्याची मागणीआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने उभारी व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून मागील शासनाच्या काळात घरकुल, विहीर, शेतात आवश्यक असणारे लाभ, मुलांच्या शिक्षणासाठीच्या योजना, अन्न सुरक्षा, गॅस जोडणी, अत्पन्नाच्या दृष्टीने शेतीपूरक व्यावसाय यासाठी अर्थसहाय्य यासह इतर आवश्यक लाभ दिले जात होते. मात्र, यावर्षी असा एकही कार्यक्रम राबवण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने राबवून आवश्यक योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. यासंदर्भात शासनाने कडक पाऊले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

महिन्यानुसार आकडेवारी : जानेवारी - १८, फेब्रुवारी - १६, मार्च - १९, एप्रिल -९, मे- ८, जून - ५  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र