शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

कापसाच्या आगारात सोयाबीनचे क्षेत्र कमालीचे वाढले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने वाढलेले दिसत आहे. सध्या बाजारात सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कपाशीच्या बॅगा मात्र शिल्लक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कापसाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजलगाव तालुक्यात खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड केली जात असे. परंतु मागील १०-१२ वर्षांपासून या भागातील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेत आहेत. या सोयाबीन क्षेत्राचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मागील वर्षी माजलगाव तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर या वर्षी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. मागील वर्षी सोयाबीनला ८ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाल्याने पुढील वर्षी भाव कमी झाला तरी एवढा कमी होईल, असे वाटत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. कापसाला लागत असलेली मेहनत, खर्च, पाणी आदी पाहता सोयाबीनचे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देऊन जाते. त्यानंतर सोयाबीन काढून त्या जागेवर रब्बीचे पीकही घेता येते, असा अंदाज बांधत शेतकऱ्यांनी भर दिल्याने या वर्षी सोयाबीनचे पेराक्षेत्र २९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. तर कापसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कृषी विभागाने बांधलेला अंदाज पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम सध्या बाजारपेठेतही जाणवत आहे. सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कापूस बियाण्यांच्या बॅगा दुकानदाराकडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. ------ कापूस व सोयाबीनचे बियाणे आम्ही कृषी विभागाकडून अंदाज घेऊन खरेदी करतो. या वर्षीही त्याचप्रमाणे बियाणे खरेदी करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याकडे कल दिल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले होते. कापसाच्या बियाण्यास पाहिजे तसा ग्राहक न मिळाल्याने व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बॅगा शिल्लक आहेत. - रामानंद भंडारी, बियाणे विक्रेते ------ पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले तरी कापसाचे पीक येऊ शकते. परंतु सोयाबीनला पाणी कमी पडल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता असते. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले. शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावे. - सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी पंचायत समिती, माजलगाव