शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

कोरोना टाळण्यासाठी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

पोलीस प्रशासनाकडून कलम १४४ लागू : आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघावे बीड : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध ...

पोलीस प्रशासनाकडून कलम १४४ लागू : आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघावे

बीड : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करिता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा यासंदर्भात शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, दैनंदिन कामकाज करताना देखील मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत तसेच सॅनिटायझर वापरावे या प्रमुख उपाययोजना आपण काटेकोरपणे पाळल्या तर, आपणास सर्वांना पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कलम १४४ बीड जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच या कलमाचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही कृती करू नये, सार्वजनिक ठिकाणी नाक व तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व दंड करण्यात येत आहे. सर्व धार्मीक, सार्वजनिक मिरवणुका, कार्यक्रम, आंदोलन, मोठ्या यात्रा यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

आवश्यक असेल तरच, ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडावे, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी करू नये, दुकानदार, खासगी प्रवासी वाहनधारकांनी मास्क न वापरणाऱ्यांना सेवा देऊ नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे बीड पोलिसांकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन देखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

गर्दीचा नियम सर्वसामान्यांनाच?

गर्दी टाळण्याचा किंवा केल्यास सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा कचाटा दाखवला जातो. मात्र, राजकीय नेत्यांच्या सभा-समारंभासाठी तसेच बैठकांसाठी गर्दीचा नियम लागू नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे गर्दी केली जात आहे. याकडे देखील जिल्हा व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी नियम सर्वांना सारखेच आहेत अशी भूमिका प्रशानाने घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.