शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दुष्काळाने वसवले गावाशेजारी दुसरे अस्थायी समांतर गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:53 IST

तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देमूळ गाव सोडून छावण्यालाच आले गावपण : चहापाण्यासाठी थाटली हॉटेल, टपऱ्या

विजयकुमार गाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे. त्यांच्या देखभालीसाठी माणसांची वर्दळ गावापेक्षा छावणीवर जास्त दिसून येत आहे.सध्या लोकसभेच्या प्रचाराची धूम सुरू आहे. त्यात मतदारांच्या गळाभेटीसाठी या समांतर गावातच प्रचारकांना जावे लागत आहे.अनेक वेळा दुष्काळ पाहिला. अनुभवला परंतु असा दुष्काळ कधी पाहिला नव्हता. संपूर्ण तालुकाच कोरडाठाक पडला. शेतीला सोडा, जिथे जनावरांना आणि माणसाला पिण्यासाठी लागणारे पाणी टँकरच्या माध्यमातून शेजारच्या तालुक्यात आयात करण्याची लाजिरवाणी वेळ प्रत्यक्षात अनुभवायला आली आहे.किमान पन्नास किलो मीटर अंतर पाणी वाहतुकीसाठी पाण्याएवढे इंधन वापरावे लागत आहे. पाण्याबरोबर तालुक्यातील चारा संपुष्टात आला. शेतकरी पूर्णत: परावलंबी बनला. जनावर दावणीला राहतील किंवा नाही या भीतीने त्रस्त होता. छावण्या हाच एकमेव पर्याय असलेल्याने मागणी जोर धरत होती. अखेर चालण्याचे दरवाजे उघडले गेले. पाहता पाहता दिवसागणिक हा आकडा वाढत गेला.गुरूवारी हाती आलेल्या आकड्यानुसार ४९ असून पैकी एक छावणी सुरू नसली तरी ४८ छावण्यांमधील राहत जनावरांची संख्या ३ हजार १८५ तर मोठ्या जनावरांची संख्या ३० हजार ४३ अशी एकूण ३३ हजार २२८ इतके पशुधन छावणीवर असल्याने छावण्या दुसरे गाव दिसू लागले. तर जनावरांच्या चारा पाण्यासाठी किमान दोन माणसे असल्याने गावात कमी छावणीवर जास्त वर्दळ आहे. म्हणून अनायासे जिथे माणसे तिथे प्राथमिक गरजा भागवण्यासाठी चहापाण्याचे छोटी हॉटेल, तंबाखू, सुपारी, बिडी काडी अशा किरकोळ गरजा पूर्ण करणारे अस्थाई दुकान तकलादू सावली तयार करुन सुरु आहेत. मध्यंतरी वादळी वाºयासह गारांचा मार खाण्याची वेळ निभावून गेली तरी तापत्या उन्हाबरोबर अचानक येणारे वारे बेचैन करून सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत हे समांतर गाव जिथल्या तिथे दिसणार आहेत.सध्या लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्याने पक्षीय प्रचारक माणूस माणूस शोधून मतांचे दान पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यासाठी त्यांनाही छावण्यावरचे हे विचित्र विश्व पाहणे भाग पडत आहे.आचारसंहिता पथकाला दिला गुंगारानिवडणुका आदर्श आचारसंहितेच्या तत्वप्रणालीनुसार व्हाव्यात यासाठी प्रशासकीय स्तरावर स्वतंत्र निगराणी करत आहे. याउपरही त्या पथकाला ही गुंगारा देऊन आपले प्रचार तंत्र वापरले जाते. त्यासाठी मार्गाने - आडमार्गाने लोकशाहीतील निवडणूक जिंकण्याची पराकाष्ठा केली जात आहे.छावणीचालकांची दमछाकनियमांना बांधील राहून जनावरांना चारा पाणी, खुराक वेळेवर देणे बंधनकारक आहे. चौकशी तपासणी पथक भेटी, तालुक्याबाहेरून चारा पाणी आणणे हे काम करीत असताना चालकांची दमछाक होते ही गोष्ट नाकारता येत नाही. स्वीकारलेले काम नियमबाह्य होता कामा नये, हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण दुष्काळ हा सेवा करण्याची संधी आहे, मेवा मिळवण्याचा व्यवसाय नाही.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र