शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:44 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जलसाठ्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी रसायनप्रयोग करा, पाणी काटकसरीने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. माजलगाव धरणाच्या काडी वडगाव येथील बॅक वॉटर आणि अमृत अटल योजनेच्या पाहणी दौºयानंतर ते बोलत होते.शहराला पाणीपुरवठा होणाºया माजलगाव धरणातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून काटकसरीने वापरावे लागेल, असे क्षीरसागर म्हणाले. परतीचा पाऊस पडण्याची आशा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर बीडकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी जलसाठ्यांवर रसायन पसरवण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, २०१९ पूर्वी ही योजना पूर्ण होणार आहे. अमृत अटल योजनेमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समांतरचे व संपूर्ण शहरातील पाईप एचडीपी हे नवीन तंत्रज्ञान असलेले असणार आहे. त्याचे आयुष्यमान ७० वर्षापुढे असेल. २०५२ ची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, किरण देशमुख, नायब तहसीलदार खिल्लारे, महाराष्ट्र राज्य प्राधीकरणचे प्रशांत भांबरे, मुखीद लाला, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने, विकास जोगदंड, विलास बडगे, विनोद मुळीक, दिलीप गोरे, राणा चौहाण आदी उपस्थित होते.बिंदुसरेत उड्या मारुन विकास होत नाहीयावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील कोल्हारवाडी ते आनंदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते काम लवकरच सुरु होईल.बार्शी नाक्याहून वडवणीकडे जाताना असलेल्या बायपासवर पादचाºयांच्या वाहतुकीसाठी दोन पूल मंजूर करण्यात आले आहेत.यासह इतर मोठ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, आम्ही ही सर्व कामे मंजूर करुन घेताना, काही जण बिंदुसरेत उड्या मारत होते, असा टोला विरोधकांचे नाव न घेता क्षीरसागरांनी लगावला.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater transportजलवाहतूक