शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:44 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जलसाठ्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी रसायनप्रयोग करा, पाणी काटकसरीने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. माजलगाव धरणाच्या काडी वडगाव येथील बॅक वॉटर आणि अमृत अटल योजनेच्या पाहणी दौºयानंतर ते बोलत होते.शहराला पाणीपुरवठा होणाºया माजलगाव धरणातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून काटकसरीने वापरावे लागेल, असे क्षीरसागर म्हणाले. परतीचा पाऊस पडण्याची आशा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर बीडकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी जलसाठ्यांवर रसायन पसरवण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, २०१९ पूर्वी ही योजना पूर्ण होणार आहे. अमृत अटल योजनेमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समांतरचे व संपूर्ण शहरातील पाईप एचडीपी हे नवीन तंत्रज्ञान असलेले असणार आहे. त्याचे आयुष्यमान ७० वर्षापुढे असेल. २०५२ ची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, किरण देशमुख, नायब तहसीलदार खिल्लारे, महाराष्ट्र राज्य प्राधीकरणचे प्रशांत भांबरे, मुखीद लाला, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने, विकास जोगदंड, विलास बडगे, विनोद मुळीक, दिलीप गोरे, राणा चौहाण आदी उपस्थित होते.बिंदुसरेत उड्या मारुन विकास होत नाहीयावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील कोल्हारवाडी ते आनंदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते काम लवकरच सुरु होईल.बार्शी नाक्याहून वडवणीकडे जाताना असलेल्या बायपासवर पादचाºयांच्या वाहतुकीसाठी दोन पूल मंजूर करण्यात आले आहेत.यासह इतर मोठ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, आम्ही ही सर्व कामे मंजूर करुन घेताना, काही जण बिंदुसरेत उड्या मारत होते, असा टोला विरोधकांचे नाव न घेता क्षीरसागरांनी लगावला.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater transportजलवाहतूक