शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:44 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जलसाठ्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी रसायनप्रयोग करा, पाणी काटकसरीने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. माजलगाव धरणाच्या काडी वडगाव येथील बॅक वॉटर आणि अमृत अटल योजनेच्या पाहणी दौºयानंतर ते बोलत होते.शहराला पाणीपुरवठा होणाºया माजलगाव धरणातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून काटकसरीने वापरावे लागेल, असे क्षीरसागर म्हणाले. परतीचा पाऊस पडण्याची आशा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर बीडकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी जलसाठ्यांवर रसायन पसरवण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, २०१९ पूर्वी ही योजना पूर्ण होणार आहे. अमृत अटल योजनेमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समांतरचे व संपूर्ण शहरातील पाईप एचडीपी हे नवीन तंत्रज्ञान असलेले असणार आहे. त्याचे आयुष्यमान ७० वर्षापुढे असेल. २०५२ ची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, किरण देशमुख, नायब तहसीलदार खिल्लारे, महाराष्ट्र राज्य प्राधीकरणचे प्रशांत भांबरे, मुखीद लाला, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने, विकास जोगदंड, विलास बडगे, विनोद मुळीक, दिलीप गोरे, राणा चौहाण आदी उपस्थित होते.बिंदुसरेत उड्या मारुन विकास होत नाहीयावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील कोल्हारवाडी ते आनंदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते काम लवकरच सुरु होईल.बार्शी नाक्याहून वडवणीकडे जाताना असलेल्या बायपासवर पादचाºयांच्या वाहतुकीसाठी दोन पूल मंजूर करण्यात आले आहेत.यासह इतर मोठ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, आम्ही ही सर्व कामे मंजूर करुन घेताना, काही जण बिंदुसरेत उड्या मारत होते, असा टोला विरोधकांचे नाव न घेता क्षीरसागरांनी लगावला.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater transportजलवाहतूक