शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:44 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जलसाठ्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी रसायनप्रयोग करा, पाणी काटकसरीने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. माजलगाव धरणाच्या काडी वडगाव येथील बॅक वॉटर आणि अमृत अटल योजनेच्या पाहणी दौºयानंतर ते बोलत होते.शहराला पाणीपुरवठा होणाºया माजलगाव धरणातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून काटकसरीने वापरावे लागेल, असे क्षीरसागर म्हणाले. परतीचा पाऊस पडण्याची आशा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर बीडकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी जलसाठ्यांवर रसायन पसरवण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, २०१९ पूर्वी ही योजना पूर्ण होणार आहे. अमृत अटल योजनेमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समांतरचे व संपूर्ण शहरातील पाईप एचडीपी हे नवीन तंत्रज्ञान असलेले असणार आहे. त्याचे आयुष्यमान ७० वर्षापुढे असेल. २०५२ ची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, किरण देशमुख, नायब तहसीलदार खिल्लारे, महाराष्ट्र राज्य प्राधीकरणचे प्रशांत भांबरे, मुखीद लाला, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने, विकास जोगदंड, विलास बडगे, विनोद मुळीक, दिलीप गोरे, राणा चौहाण आदी उपस्थित होते.बिंदुसरेत उड्या मारुन विकास होत नाहीयावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील कोल्हारवाडी ते आनंदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते काम लवकरच सुरु होईल.बार्शी नाक्याहून वडवणीकडे जाताना असलेल्या बायपासवर पादचाºयांच्या वाहतुकीसाठी दोन पूल मंजूर करण्यात आले आहेत.यासह इतर मोठ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, आम्ही ही सर्व कामे मंजूर करुन घेताना, काही जण बिंदुसरेत उड्या मारत होते, असा टोला विरोधकांचे नाव न घेता क्षीरसागरांनी लगावला.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater transportजलवाहतूक