शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर ...

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. अंमळनेर व पिंपळवंडी परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्यामुळे पिके उद्‌ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

१४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडासह गारांच्या पावसाने धो-धो सुरुवात केली. या अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती, त्यांना या गारपीटांचा सामना करावा लागला. जनावरे आणि शेतकरी या दोघांना पावसाने झोडपले. शेतात शेतकऱ्यांनी लागवड केलेली कांदे, वांगे, तंबाटे, मिरची, शेवगा तसेच मोठ्या प्रमाणावर आलेल्या आंब्याची फळे या गारपिटीमुळे जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच कोरोनाचा होत असलेला कहर आणि त्यात गारपीटांचा पाऊस यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आला आहे.

आंबा या फळांचे तर खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने झोडपल्याने फळबागांचेही मोठे नुकसान होऊन या फळांची व मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतात तोडण्यासाठी आलेला उभा असलेला शेवगा या गारपीटांच्या पावसाने आडवा झाला. जाधववाडीत सोमनाथ जाधव यांच्या शेतातील उभा असलेला शेवगा तोडुन बाजारात विक्रिसाठी नेण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाऊन आणि या गारपीटांच्या तावडीत सापडल्याने शेवगा बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. शेवग्याच्या फळबागाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

नफा सोडा झालेला खर्च देखील पाण्यात गेल्याने जाधववाडीच्या जाधव कुटुंबाला या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. चंद्रेवाडीत अनेक शेतकरी वांगे, कांदा, मिरची, तंबाटे अशी बाजारात विकली जाणारे भाजी पाल्यांचे उत्पादन घेतात परंतु या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे रामचंद्र कापसे यांनी सांगितले.

पिंपळवंडीचे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब पवार यांची आंब्याची बाग या पावसाने झोडपून निघाल्याने आंब्याखाली मोठ्या संख्येने कैऱ्याचा खच पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त फळांचा पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले. एकंदरीत अंमळनेर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता गारपिटीमुळे दुसरे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चिंताग्रस्त बनल्याचे दिसून येत आहेत.

===Photopath===

150421\img-20210415-wa0143_14.jpg~150421\img-20210414-wa0219_14.jpg

===Caption===

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना आ. आजबे.