शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर ...

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. अंमळनेर व पिंपळवंडी परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्यामुळे पिके उद्‌ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

१४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडासह गारांच्या पावसाने धो-धो सुरुवात केली. या अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती, त्यांना या गारपीटांचा सामना करावा लागला. जनावरे आणि शेतकरी या दोघांना पावसाने झोडपले. शेतात शेतकऱ्यांनी लागवड केलेली कांदे, वांगे, तंबाटे, मिरची, शेवगा तसेच मोठ्या प्रमाणावर आलेल्या आंब्याची फळे या गारपिटीमुळे जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच कोरोनाचा होत असलेला कहर आणि त्यात गारपीटांचा पाऊस यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आला आहे.

आंबा या फळांचे तर खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने झोडपल्याने फळबागांचेही मोठे नुकसान होऊन या फळांची व मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतात तोडण्यासाठी आलेला उभा असलेला शेवगा या गारपीटांच्या पावसाने आडवा झाला. जाधववाडीत सोमनाथ जाधव यांच्या शेतातील उभा असलेला शेवगा तोडुन बाजारात विक्रिसाठी नेण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाऊन आणि या गारपीटांच्या तावडीत सापडल्याने शेवगा बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. शेवग्याच्या फळबागाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

नफा सोडा झालेला खर्च देखील पाण्यात गेल्याने जाधववाडीच्या जाधव कुटुंबाला या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. चंद्रेवाडीत अनेक शेतकरी वांगे, कांदा, मिरची, तंबाटे अशी बाजारात विकली जाणारे भाजी पाल्यांचे उत्पादन घेतात परंतु या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे रामचंद्र कापसे यांनी सांगितले.

पिंपळवंडीचे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब पवार यांची आंब्याची बाग या पावसाने झोडपून निघाल्याने आंब्याखाली मोठ्या संख्येने कैऱ्याचा खच पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त फळांचा पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले. एकंदरीत अंमळनेर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता गारपिटीमुळे दुसरे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चिंताग्रस्त बनल्याचे दिसून येत आहेत.

===Photopath===

150421\img-20210415-wa0143_14.jpg~150421\img-20210414-wa0219_14.jpg

===Caption===

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना आ. आजबे.