शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर ...

यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. अंमळनेर व पिंपळवंडी परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्यामुळे पिके उद्‌ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

१४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडासह गारांच्या पावसाने धो-धो सुरुवात केली. या अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती, त्यांना या गारपीटांचा सामना करावा लागला. जनावरे आणि शेतकरी या दोघांना पावसाने झोडपले. शेतात शेतकऱ्यांनी लागवड केलेली कांदे, वांगे, तंबाटे, मिरची, शेवगा तसेच मोठ्या प्रमाणावर आलेल्या आंब्याची फळे या गारपिटीमुळे जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच कोरोनाचा होत असलेला कहर आणि त्यात गारपीटांचा पाऊस यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आला आहे.

आंबा या फळांचे तर खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने झोडपल्याने फळबागांचेही मोठे नुकसान होऊन या फळांची व मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतात तोडण्यासाठी आलेला उभा असलेला शेवगा या गारपीटांच्या पावसाने आडवा झाला. जाधववाडीत सोमनाथ जाधव यांच्या शेतातील उभा असलेला शेवगा तोडुन बाजारात विक्रिसाठी नेण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाऊन आणि या गारपीटांच्या तावडीत सापडल्याने शेवगा बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. शेवग्याच्या फळबागाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

नफा सोडा झालेला खर्च देखील पाण्यात गेल्याने जाधववाडीच्या जाधव कुटुंबाला या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. चंद्रेवाडीत अनेक शेतकरी वांगे, कांदा, मिरची, तंबाटे अशी बाजारात विकली जाणारे भाजी पाल्यांचे उत्पादन घेतात परंतु या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे रामचंद्र कापसे यांनी सांगितले.

पिंपळवंडीचे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब पवार यांची आंब्याची बाग या पावसाने झोडपून निघाल्याने आंब्याखाली मोठ्या संख्येने कैऱ्याचा खच पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त फळांचा पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले. एकंदरीत अंमळनेर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता गारपिटीमुळे दुसरे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चिंताग्रस्त बनल्याचे दिसून येत आहेत.

===Photopath===

150421\img-20210415-wa0143_14.jpg~150421\img-20210414-wa0219_14.jpg

===Caption===

अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना आ. आजबे.