शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या पादुका पंढरपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

पौर्णिमा काला होईपर्यंत भगवानगडाच्या मठात मुक्काम शिरूर कासार : हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या चरण ...

पौर्णिमा काला होईपर्यंत भगवानगडाच्या मठात मुक्काम

शिरूर कासार : हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या चरण पादुका मंगळवारी गडावरून निघून पंढरपुरात दाखल झाल्या असून पौर्णिमेचा काला होईपर्यंत भगवान गडाच्या पंढरपूर येथील मठातच त्या विसावणार असल्याची माहिती भगवान गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांनी दिली.

संत भगवान बाबांनी गडावरून पायी दिंडी सोहळा सुरू केला होता. परंपरेप्रमाणे संत भीमसिंह महाराज यांनीदेखील तो वसा चालवला होता.त्यानंतर विद्यमान महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी तीच परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली. मात्र, गेल्यावर्षी व यंदाही कोरोनाचे संकट आडवे आल्याने शासन निर्देशानुसार दिंडी परंपरा ही संत पादुका वाहनांमध्ये नेऊन औपचारिकता पूर्ण करावी लागली. महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी गडावरून यथावत पूजा करून पादुकांचे प्रस्थान झाले. भगवान गडाचे साधक पादुका प्रस्थानवेळी आवर्जून उपस्थित होते. पादुकांसोबत प्रधान आचार्य नारायण स्वामींसह ॲड. भाऊसाहेब बटूळे, जीवन सानप, बळिराम महाराज आदी मंडळींसमवेत होती.

वारकरी आनंदाला पारखे

संत पादुकांना चंद्रभागेचे तीर्थस्नान घालून परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मठात विसावल्या असून काला झाल्यानंतर त्यांना गडावर आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले. श्रीक्षेत्र भगवानगडावरून हा दिंडी सोहळा हजारो भाविकांसह पंढरपूरला जात असतो. दहा मुक्काम करून पंढरपूरला पोहोचत असतो. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी वाहनाद्वारेच पादुका पंढरपूरला पोहोचल्या आहेत. संतांसमवेत भजन करत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मात्र या आनंदाला पारखे व्हावे लागले आहे.