शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

समृद्ध शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:11 IST

कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.येथील दसरा मैदानावर ६ डिसेंबर पासून स्व. कृषीरत्न गणेशराव बेदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासन कृषी, पणन विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी शेतकरी युवती संघटनेच्या पूजा मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे, दादासाहेब मुंडे, अ‍ॅड.सुरेश हात्ते, काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, महादेव धांडे, सुनील नागरगोजे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. त्याचबरोबर शेतक-यांच्या घामाला व त्याच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांचा स्वाभिमान जगला पाहिजे अशी भूमिका आपण काँग्रेसच्या माध्यमातून उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कृषी प्रदर्शनातून शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करत आहे. हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडणारे असून उपाययोजना मात्र शून्य असल्याने जनतेतून सरकारविरोधात प्रचंड संताप आहे असे पटोले यांनी सांगितले.याप्रसंगी पूजा मोरे, अमर खानापुरे यांची देखील भाषणे झाली.दरम्यान कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया गिरीश थावरे, विष्णू जायभाये, इंजि. पी. आर. देशमुख, राजेंद्र जाधव, गोकुळ मेघारे, आतिष गरड, सीताराम मस्के आदी शेतक-यांचा स्व.गणेशराव बेदरे कृषीरत्न पुरस्कार खा. नाना पटोले व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महेश बेदरे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव चाटे यांनी केले.भाजप शेतकरीविरोधी : पटोलेभाजप सरकार हे घात करणारे असून, यांनी पक्षात एकनाथ खडसे यांचा घात केला. तसेच स्व.गोपीनाथ मुंडे यांचा देखील यांनीच घात केल्याची टीका खा. नाना पटोले यांनी केली. तसेच शेतक-यांसाठी काम करणारे, त्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारे हे सरकारचे दुश्मन आहेत. सत्तेत आल्यानंतर शेतक-यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना, शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याऐवजी शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेत आहे. यामुळे मी माझा खासदारकीचा राजीनामा फेकला, असे ते म्हणाले. शेतकरी विरोधी धोरणामुळे कृषी प्रधान देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते नक्कीच माझ्यासोबत राहिले असते, असे सांगतानाच बाकी का राहत नाहीत, असा प्रश्न खा.पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNana Patoleनाना पटोले