शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

वैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन लोकमत न्यूज गेवराई तालुक्यातील ...

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज गेवराई

तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्‌ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. यामुळे या भागातील या अवजड वाहनाने खराब होत आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याने, या विरोधात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी गोदा पट्‌ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.१३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने, त्यांनी मंगळवारी उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, दि. ४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात हायवाने चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेने गोदा पट्‌ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून, विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळे गोदा पट्‌ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, वाळू तस्करी करणाऱ्यावर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून, त्याचे दर कमी करण्यात यावेत, असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत. इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे सहा वर्षांत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राइस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत, त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणाऱ्यावर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाइलद्वारे अपडेट माहिती देणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे. मात्र, पोलीस अंमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्‌ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलनाबाबत असलेले नियम अपसेट प्राइससंदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी, यासह आदी मागण्या घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी गोदावरी व सिंदफना पट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी आ.लक्ष्मण पवार, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, सभापती दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, सरपंच ॲड.उद्धव रासकर, समाधान मस्के यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.

चौकट -

सायंकाळी उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी भेट देऊन आ.पवार यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली, तसेच वाळू बाबतीत निवेदनात दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी सचिवांशी बोलून वेळ मागवून घेत असल्याचे एसडीएम नामदेव टिळेकरांनी सांगितले असता, सचिवांनी शब्द डावलला, तर मंत्रालयासमोरच उपोषण करण्याचा इशारा आ.पवार यांनी यावेळी दिला.