शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली ...

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. परिणामी शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे गुरुवारी महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार कोळगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.

मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेत आहेत. कोळगाव, तांदळा, सुशी, वडगाव, बंगाली-पिंपळा, सावरगाव,साठेवाडी आदी दहा ते बारा गावातील परिसरात रब्बी हंगामातील पिकांचा मोठ्या पेरा झालेला असून ही पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतानाच या परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी, खरबूज, टरबूज, काकडी आदी पिकांसह आंबा, चिकू, जांब आदी फळबागांसह भाजीपाल्यांचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले.

दरम्यान तहसील प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी कोळगावसह परिसरात तलाठी डी.ए.शेळके, कृषी सहाय्यक सानप, ग्रामसेवक घोलप यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संयुक्तिक गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच या भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. तर शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षण सभापती पंढरीनाथ लगड, सरपंच उद्धव रासकर, लक्ष्मणराव हिंदोळे, रमेश मुंगसे, राहुल रासकरसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान मोठे आहे. तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

डी .ए. शेळके तलाठी, कोळगाव

गारपीट झालेल्या गावात संबंधितांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.

सचिन खाडे

तहसीलदार, गेवराई

गेवराई - कोळगाव येथील जालिंदर जोगदंड यांच्या शेतातील कांदा पिकाचा पंचनामा करताना तलाठी डी. ए. शेळके सह आदी.

===Photopath===

150421\img-20210415-wa0349_14.jpg~150421\img-20210415-wa0351_14.jpg