शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली ...

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. परिणामी शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे गुरुवारी महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार कोळगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.

मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेत आहेत. कोळगाव, तांदळा, सुशी, वडगाव, बंगाली-पिंपळा, सावरगाव,साठेवाडी आदी दहा ते बारा गावातील परिसरात रब्बी हंगामातील पिकांचा मोठ्या पेरा झालेला असून ही पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतानाच या परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी, खरबूज, टरबूज, काकडी आदी पिकांसह आंबा, चिकू, जांब आदी फळबागांसह भाजीपाल्यांचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले.

दरम्यान तहसील प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी कोळगावसह परिसरात तलाठी डी.ए.शेळके, कृषी सहाय्यक सानप, ग्रामसेवक घोलप यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संयुक्तिक गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच या भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. तर शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षण सभापती पंढरीनाथ लगड, सरपंच उद्धव रासकर, लक्ष्मणराव हिंदोळे, रमेश मुंगसे, राहुल रासकरसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान मोठे आहे. तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

डी .ए. शेळके तलाठी, कोळगाव

गारपीट झालेल्या गावात संबंधितांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.

सचिन खाडे

तहसीलदार, गेवराई

गेवराई - कोळगाव येथील जालिंदर जोगदंड यांच्या शेतातील कांदा पिकाचा पंचनामा करताना तलाठी डी. ए. शेळके सह आदी.

===Photopath===

150421\img-20210415-wa0349_14.jpg~150421\img-20210415-wa0351_14.jpg