शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली ...

गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. परिणामी शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे गुरुवारी महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार कोळगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.

मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेत आहेत. कोळगाव, तांदळा, सुशी, वडगाव, बंगाली-पिंपळा, सावरगाव,साठेवाडी आदी दहा ते बारा गावातील परिसरात रब्बी हंगामातील पिकांचा मोठ्या पेरा झालेला असून ही पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतानाच या परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी, खरबूज, टरबूज, काकडी आदी पिकांसह आंबा, चिकू, जांब आदी फळबागांसह भाजीपाल्यांचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले.

दरम्यान तहसील प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी कोळगावसह परिसरात तलाठी डी.ए.शेळके, कृषी सहाय्यक सानप, ग्रामसेवक घोलप यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संयुक्तिक गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच या भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. तर शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षण सभापती पंढरीनाथ लगड, सरपंच उद्धव रासकर, लक्ष्मणराव हिंदोळे, रमेश मुंगसे, राहुल रासकरसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान मोठे आहे. तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

डी .ए. शेळके तलाठी, कोळगाव

गारपीट झालेल्या गावात संबंधितांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.

सचिन खाडे

तहसीलदार, गेवराई

गेवराई - कोळगाव येथील जालिंदर जोगदंड यांच्या शेतातील कांदा पिकाचा पंचनामा करताना तलाठी डी. ए. शेळके सह आदी.

===Photopath===

150421\img-20210415-wa0349_14.jpg~150421\img-20210415-wa0351_14.jpg