शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

गोदावरी नदीपात्रातील पाणीउपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांचे पथक : अवैध पाणी उपसा थांबविण्याचे आव्हान

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, चोरट्या पद्धतीने भरमसाठ पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी गेवराई तहसीलदार यांनी पथकाची स्थापना केली आहे. यामुळे अवैध पाणी उपसा रोखता येणार आहे.गेवराई तालुक्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरीच्या पात्रातून माजलगाव धरणात काही दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर बीड, माजलगाव या दोन्ही शहरांना व परिसरातील गावांना पाणी पुरवाठा केला जातो.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी माजलगाव धरणापर्यंत पोहचावे यासाठी नदी पात्रातील मोटारी व वीज बंद करण्यात आली होती. तरी देखील अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक उमापूर, धोडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळातील गोदापात्रालगतच्या गावांमध्ये गस्त घालून नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.गस्त घालून कारवाईगेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रालगत होत असलेला पाणी उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांचे पथक नेमले.हे पथक उमापूर, धोंडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळात गस्त घालून होणार कारवाई

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीटंचाईgodavariगोदावरी